Homeपब्लिक फिगरनागपूरच्या दीक्षाभूमीवरील काम...

नागपूरच्या दीक्षाभूमीवरील काम रद्द करा!

नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या कामाविषयी कॉँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी काल, सोमवारी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे राज्य विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी हे काम तातडीने स्थगित केले जाईल, अशी घोषणाही केली. मात्र, आज मंगळवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच राऊत यांनी हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. दीक्षाभूमीवर सुरू असलेले काम स्थगित न करता रद्द करावे आणि दीक्षाभूमीच्या परिसरात या पवित्र स्थळाला बाधा येईल, नुकसान होईल, असे कोणतेही काम केले जाऊ नये, अशी मागणी व़डेट्टीवार यांनी केली.

प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. नियम ५७च्या आधारे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून हा विषय चर्चेला घ्यावा, अशी मागणी केली.

दीक्षाभूमी

काल, आंदोलकांवर दीक्षाभूमीपाशी लाठीमार केला गेला आणि आज दीक्षाभूमीला छावणीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे सभागृहातील सदस्यांची समिती करून तेथे भेट देऊन पाहणी करायला हवी. त्यासाठी सभागृहात बाकी सगळे विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी राऊत यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी काल या विषयावर उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला असल्याने नियम ५७मध्ये ही सूचना बसत नसल्याने नाकारत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला.

नियम ५७मध्ये विरोधी पक्षनेते तसेच राऊत यांची नोटीस बसत नाही, हे अध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यानंतर ११ वाजून १० मिनिटांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. प्रश्नोत्तराच्या तासातील दहा मिनिटे या नाकारलेल्या नोटिशीवर सभागृहाने कारणी लावली.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content