Homeटॉप स्टोरीदोघेही समदुःखी आणि...

दोघेही समदुःखी आणि आनंदीही!

पूर्वीच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचेस हे दोन मोठे नेते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक. दोघेही गजाआड राहिलेले.. समदःखी आणि मोकळ्या हवेत लोकशाहीतली मूल्ये जपण्यासाठी विधानभवनात यायला मिळाले म्हणून आनंदीही… महाविकास आघाडी सरकारमधले हे दोघेही पॉवरफुल मंत्री. तेव्हाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या तिखट हल्ल्याला परतवत सर्व विरोधकांना पूर्ण तयारीनिशी जाणाऱ्या या दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे बराच काळ तुरूंगात गजाआड घालवावा लागला. तोही त्यांचे सरकार असताना… केंद्रीय तपासयंत्रणांच्या दणक्यामुळे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना पदावर असतानाच तुरूंगात जावे लागले.

सरकार बदलले… एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सरकारची वर्षपूर्ती झाली नाही तोच राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर प्रथम अनिल देशमुख व नंतर नवाब मलिकही जामिनावर कारागृहाबाहेर आले. राष्ट्रवादीची दोन शकले झाली. एका गटाचे नेतृत्त्व शरद पवार करत आहेत तर दुसऱ्या गटाचे नेतृत्त्व अजितदादा करत आहेत. दोन्ही बाजूंनी पक्षावर तसेच चिन्हावर दावा करण्यात आला आहे. त्याचा फैसला अजून व्हायचा आहे.

तुरूंगातून जामिनावर का होईना बाहेर आलेल्या या दोन नेत्यांपैकी अनिल देशमुख शरद पवार यांची साथ देत आहेत तर नवाब मलिक अजितदादांच्या गटात सहभागी झाले आहेत. आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे दोन्ही नेते नागपूरला विधानभवनाच्या आवारात दाखल झाले. एकमेकांना असे मोकळे, मोकळ्या वातावरणात बघून त्यांना एकत्रिक फोटो घेण्याचा मोहही आवरला नाही. त्यानंतर उभयतांनी परस्परांची चौकशीही केली. मग कामकाजात सहभागी होण्याकरीता दोघेही आतमध्ये रवाना झाले.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content