Homeडेली पल्सकाळा पैशांचा सर्वात...

काळा पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्ये!

भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमधले किती डॉक्टर, किती वेळा मातोश्रीमध्ये ब्लडप्रेशर तपासायला गेले होते, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. काळा पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्येच बसला आहे. त्यांच्या कर्जत फार्महाऊसच्या जमिनीखाली दोन हजारांच्या किती नोटा दडवल्या गेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

काल बीडमध्ये उबाठा सेनेची महाप्रबोधन यात्रा झाली. ही यात्रा उबाठा सेनेची होती की राष्ट्रवादीची, हेच समजले नाही. संध्याकाळची पाचची वेळ दिली होती. रात्री आठ वाजता सभा सुरू झाली. कार्यकर्ते फिरकले नाहीत. खुर्च्या रिकाम्या होत्या. स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना किती वेळा फोन केले गेले, याचा थांगपत्ता नाही. स्वतःला जागतिक नेते समजणारे दोन प्रवक्ते सभेला साधी गर्दीही जमवू शकत नाहीत आणि हेच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करतात. पूर्वी बाळासाहेबांच्या सभेत सुधीर जोशी, लीलाधर डाके, प्रमोद नवलकर अशा तोफा होत्या. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रबोधन होत होते. आता सोफा, एसीची वसुली करणारे, बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारे, आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणणारे, मुलाला संपवून टाकू असे बोलणारे वक्ते भाषण करताहेत, असे ते म्हणाले.

हे संजय राजाराम राऊत कालच्या भाषणाच्या वेळेला किती शुद्धीत होते हे त्यांनाच माहीत. दोन नाईन्टी घेतल्याशिवाय हा माणूस बोलत नाही. भाषणाआधी यांची अल्कोहोल टेस्ट केली की सगळं काही स्पष्ट होईल. जो माणूस शुद्धीत भाषण करू शकत नाही, वसुलीशिवाय सभा घेऊ शकत नाही आणि पंतप्रधानांवर टीका करतो… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटनचे पंतप्रधान ज्यांना मानसन्मान देतात, जागतिक स्तरावर ज्यांची कीर्ती आहे, त्यांच्यावर टीका करताना यांना काही वाटत नाही. तुमच्या मालकाला साधे कलानगरमध्ये कोण ओळखत नाही. फुकट्यासारखे आयुष्य जगणारे, स्वतःच्या पैशाने साधे परफ्युम मारत नाही. पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची हिम्मत कशी होते, असा सवाल राणे यांनी केला.

कर्जतला जे फार्महाऊस आहे त्याची जमीन जेसीबीने खोदा. देशातल्या दोन हजार नोटांमधल्या अर्ध्या नोटा तिथे सापडतील. सुशांत सिंगच्या हत्त्येनंतर एका टीव्हीचा पत्रकार फार्महाऊसपर्यंत पोहोचला होता. परंतु त्याला नंतर अटक झाली. महाविकास आघाडीच्या काळात, पंचवीस वर्षे महापालिका लुटली त्या काळातले पैसे, सगळे तिथेच दडलेले आहेत. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी रेटकार्ड निघाले आहे. युवा सेनेतून तिकीट पाहिजे असेल तर दोन कोटींचा रेट चालू आहे. ज्याने घाम गाळला, ज्यांनी निष्ठा दाखवली, त्यांना मानसन्मान नाही. त्यांना तिकीट नाही. उद्धव ठाकरेंनी जी प्रथा सुरू केली तीच प्रथा त्यांचा मुलगा आता युवा सेनेत राबवतोय, असेही ते म्हणाले.

मातोश्रीचा पोपट मेलेला आहे. हे सरकार टिकलेले आहे. हे जितके लवकर पचवाल तितकी तुमची तब्येत चांगली राहील. शिंदे सरकार 2024पर्यंत राहणार आणि नंतरही आम्हीच सत्तेत येणार. त्यामुळे कितीही बोंबलला तरी काहीही होणार नाही, हे लक्षात ठेवा असे त्यांनी सांगितले.

कर्जतच्या फार्महाऊसची चौकशी केली तर समजेल की मराठी माणसाला लुटून यांनी कुठे पैसा पुरून ठेवला ते… आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आपापले एजंट नेमले आहेत. भाचा, मेव्हणा, सगळ्या माध्यमातून कामे होतात. वैभव चेंबर्समध्ये डिलिंग होतात. तुमचे मालक सर्वात जास्त 420 आहेत, हे संजय राजाराम राऊत यांना माहित नाही का? नालेसफाईपासून रस्त्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत यांनी पैसा खाल्ला. आता पारदर्शकपणे काम होत आहे. त्यामुळे घेतलेले पैसे परत द्यावे लागतील या भीतीने, मासे जसे पाण्याशिवाय तडफडतात तशी आता यांची फडफड चालू आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content