Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला...

महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो!

अहो पालिका आयुक्त, महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो… स्थळः ठाण्यातला तीन पेट्रोल पम्प परिसर. नेमकं ठिकाण विष्णुनगर पोलीस चौकीला लागूनच! अगदी पाच पावलावर! महाराष्ट्रगीत तसेच अनेक आजरामर नाट्यकृतींनी तमाम महाराष्ट्राला माहित असलेलं लाडकं नाव म्हणजे रामगणेश गडकरी!! ठाणे शहरात त्यांच्या गौरवार्थ गडकरी रंगायतन हे नाट्यगृहही आहे. अशी सर्व परिस्थिती असताना त्यांच्या नावाचा फलक पालिका कचरा कुंडीच्या जवळ असावा हे संतापजनकच नव्हे तर कविकुलाचा अपमान करणारेच कृत्य आहे. खरंतर या चुकीला माफी नाहीच!!

शहरातील कचराही हटवला गेला पाहिजे हे मान्य आहे. पण भाषाप्रभुच्या फलकाशेजारी कचऱ्याने बरबटलेली लक्तरे व कचरा आजबाजूला फेकलेला असणे कितपत योग्य आहे याचा विचार आजूबाजूला राहणाऱ्या आणि ‘आनंद’ नावाच्या मिजाशीत वावरणाऱ्या सर्वांनाच लाजेने माना खाली घालायला लावणारा आहे.

“मंगलदेशा पवित्र देशा! महाराष्ट्र देशा|

प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा||

असे अवीट गीत लिहिणाऱ्या कवीच्या वाटेला अशी अरसिक पालिका येऊ नये असे मनोमन वाटते. कवी पुढे म्हणतात…

“शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरीच्या देशा|

पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्याच्या देशा||”

अशा गोड शब्दांत राज्याचे वर्णन करणाऱ्या कवीच्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय हे पाहिल्यावर डोक्याचा लोच्याच झाला नाही तरच नवल! ‘कल्पनेचे धाडस व चमत्कृती हा जर काव्याचा एक मुख्य गुण मानला तर त्याबाबतीत गडकऱ्यांची बरोबरी करणारे किती निघतील, असा प्रश्न टाकण्यात मुळीच हरकत नाही’ अशी प्रशंसा खुद्द तत्कालीन केसरी व मराठाचे संपादक, प्रख्यात साहित्यिक न. चिं. केळकर यांनी केली होती. हे गडकरींचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारीच होती हे कोण अमान्य करेल?

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content