Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला...

महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो!

अहो पालिका आयुक्त, महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो… स्थळः ठाण्यातला तीन पेट्रोल पम्प परिसर. नेमकं ठिकाण विष्णुनगर पोलीस चौकीला लागूनच! अगदी पाच पावलावर! महाराष्ट्रगीत तसेच अनेक आजरामर नाट्यकृतींनी तमाम महाराष्ट्राला माहित असलेलं लाडकं नाव म्हणजे रामगणेश गडकरी!! ठाणे शहरात त्यांच्या गौरवार्थ गडकरी रंगायतन हे नाट्यगृहही आहे. अशी सर्व परिस्थिती असताना त्यांच्या नावाचा फलक पालिका कचरा कुंडीच्या जवळ असावा हे संतापजनकच नव्हे तर कविकुलाचा अपमान करणारेच कृत्य आहे. खरंतर या चुकीला माफी नाहीच!!

शहरातील कचराही हटवला गेला पाहिजे हे मान्य आहे. पण भाषाप्रभुच्या फलकाशेजारी कचऱ्याने बरबटलेली लक्तरे व कचरा आजबाजूला फेकलेला असणे कितपत योग्य आहे याचा विचार आजूबाजूला राहणाऱ्या आणि ‘आनंद’ नावाच्या मिजाशीत वावरणाऱ्या सर्वांनाच लाजेने माना खाली घालायला लावणारा आहे.

“मंगलदेशा पवित्र देशा! महाराष्ट्र देशा|

प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा||

असे अवीट गीत लिहिणाऱ्या कवीच्या वाटेला अशी अरसिक पालिका येऊ नये असे मनोमन वाटते. कवी पुढे म्हणतात…

“शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरीच्या देशा|

पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्याच्या देशा||”

अशा गोड शब्दांत राज्याचे वर्णन करणाऱ्या कवीच्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय हे पाहिल्यावर डोक्याचा लोच्याच झाला नाही तरच नवल! ‘कल्पनेचे धाडस व चमत्कृती हा जर काव्याचा एक मुख्य गुण मानला तर त्याबाबतीत गडकऱ्यांची बरोबरी करणारे किती निघतील, असा प्रश्न टाकण्यात मुळीच हरकत नाही’ अशी प्रशंसा खुद्द तत्कालीन केसरी व मराठाचे संपादक, प्रख्यात साहित्यिक न. चिं. केळकर यांनी केली होती. हे गडकरींचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारीच होती हे कोण अमान्य करेल?

Continue reading

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...
Skip to content