Homeपब्लिक फिगरअंतराळवीर शुक्ला करणार...

अंतराळवीर शुक्ला करणार एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांच्या पुनरुज्जीवनाचा अभ्यास

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील ‘एक्स्ट्रीमोफाइल्स – टार्डिग्रेड्स’चे पुनरुज्जीवन तसेच त्यांचे अस्तित्व तपासणार आहे. शुक्ला अवकाशातील शारीरिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक प्रतिक्रियांचा तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सतत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वापरण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, जो भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा पैलू आहे. याशिवाय ते टार्डिग्रेड्ससारख्या एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांचे पुनरुज्जीवन, निभाव आणि पुनरुत्पादन याविषयी प्रयोग करतील, अशी माहिती केंद्रीय अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल दिल्लीत सांगितले.

गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन शुक्ला हे एक आहेत. प्रशांत नायर, अंगद प्रताप आणि अजित कृष्णन हे या पथकातले इतर अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन नायर यांना अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेसाठी राखीव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारताची पहिली मानवासह अंतराळ यान मोहीम  गगनयानची, सध्या चाचणी प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम 2027च्या सुरुवातीला पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अशाप्रकारच्या अंतराळगमनाचे प्रयोग भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे भारत अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल.

डॉ. सिंह यांनी मानवासह यान पाठवून, अवकाश आणि खोल समुद्र संशोधनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. भारतीय किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही सागरी अर्थव्यवस्था अद्याप पूर्णतः कार्यक्षम नाही. खोल समुद्र अभियान सागरी क्षमतेचा उपयोग करण्यासाठी राबविले जात आहे, असे त्यांनी नमूद केले. नागरी हवाई वाहतुकीबाबत ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक आता सहजतेने हवाईप्रवास करू शकतात. अनेक नवीन विमानतळांचे उद्घाटन  झाले असून विमानचालकांना वाढती मागणी आहे. यासाठी सीएसआयआर-एनएएलने दोन-आसनी प्रशिक्षक विमान विकसित केले असून खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने इलेक्ट्रिक हंसा – (ई-हंसा)चे उत्पादन वाढविण्याचे काम सुरू आहे.

Continue reading

जि.प. निवडणुकीत आंबेडकर, जानकरांपाठोपाठ शेंडगेही काँग्रेसबरोबर

महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीलाही बरोबर घेतले आहे. ही...

भाजपात निष्ठावंतांकडून उचल खाण्यास सुरूवात!

गेल्या काही वर्षांपासून पक्षवाढीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीत (भाजपा) विविध पक्षांमधून होणाऱ्या इनकमिंगमुळे मूळच्या भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाला आता वाचा फुटू लागली आहे. पक्षवाढ करताना वेगवेगळ्या पक्षांमधून कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेलेच पाहिजेत. पण त्यामुळे वर्षानुवर्षे संधीच्या आशेवर कार्यरत...

महाराष्ट्रात थंडीची लाट हळूहळू ओसरणार!

या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा आणि दिवसा सूर्यप्रकाशामुळे जाणवणारा उकाडा, अशा दुहेरी वातावरणाने नागरिक काहीसे...
Skip to content