Homeपब्लिक फिगरअंतराळवीर शुक्ला करणार...

अंतराळवीर शुक्ला करणार एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांच्या पुनरुज्जीवनाचा अभ्यास

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील ‘एक्स्ट्रीमोफाइल्स – टार्डिग्रेड्स’चे पुनरुज्जीवन तसेच त्यांचे अस्तित्व तपासणार आहे. शुक्ला अवकाशातील शारीरिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक प्रतिक्रियांचा तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सतत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वापरण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, जो भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा पैलू आहे. याशिवाय ते टार्डिग्रेड्ससारख्या एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांचे पुनरुज्जीवन, निभाव आणि पुनरुत्पादन याविषयी प्रयोग करतील, अशी माहिती केंद्रीय अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल दिल्लीत सांगितले.

गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन शुक्ला हे एक आहेत. प्रशांत नायर, अंगद प्रताप आणि अजित कृष्णन हे या पथकातले इतर अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन नायर यांना अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेसाठी राखीव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारताची पहिली मानवासह अंतराळ यान मोहीम  गगनयानची, सध्या चाचणी प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम 2027च्या सुरुवातीला पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अशाप्रकारच्या अंतराळगमनाचे प्रयोग भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे भारत अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल.

डॉ. सिंह यांनी मानवासह यान पाठवून, अवकाश आणि खोल समुद्र संशोधनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. भारतीय किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही सागरी अर्थव्यवस्था अद्याप पूर्णतः कार्यक्षम नाही. खोल समुद्र अभियान सागरी क्षमतेचा उपयोग करण्यासाठी राबविले जात आहे, असे त्यांनी नमूद केले. नागरी हवाई वाहतुकीबाबत ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक आता सहजतेने हवाईप्रवास करू शकतात. अनेक नवीन विमानतळांचे उद्घाटन  झाले असून विमानचालकांना वाढती मागणी आहे. यासाठी सीएसआयआर-एनएएलने दोन-आसनी प्रशिक्षक विमान विकसित केले असून खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने इलेक्ट्रिक हंसा – (ई-हंसा)चे उत्पादन वाढविण्याचे काम सुरू आहे.

Continue reading

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content