Homeकल्चर +'अमायरा'ला प्रेक्षकांचा उदंड...

‘अमायरा’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी यामुळे या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड केली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून सर्वात यंग अभिनेत्री म्हणजेच सई गोडबोलेला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देत आहेत.

काही सिनेप्रेमी प्रतिक्रिया देत म्हणाले की, ही फक्त कथा नसून, ती एक भावना आहे. सिनेमा पाहून मनापासून समाधान वाटलं. या चित्रपटाचे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, असं एकाचं म्हणणं होतं. या चित्रपटात नव्या चेहऱ्याने साकारलेली मुख्य भूमिका तितकीच ताकदवान आहे. सईच्या नैसर्गिक अभिनयाने भारावून टाकले आहे. संगीतसुद्धा चित्रपटाचे वैशिष्ट्य असून प्रत्येक गाणं कथानकात सहज मिसळत जाते. विशेष म्हणजे, चित्रपटात एक अप्रतिक्षित वळण येतं जे आश्चर्यचकित करतं, असं मत एकाने व्यक्त केलं. संगीत, छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत यांनाही विशेष दाद मिळत आहे. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटाचे अनेक भावस्पर्शी प्रसंग शेअर करत चित्रपटाविषयी आपले प्रेम व्यक्त केले आहे.

“अमायरा” हा चित्रपट प्रेम, संघर्ष आणि आत्मभानाच्या प्रवासाची कथा सांगतो. आजच्या तरुणाईला भावणारा असा हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटच्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. या सिनेमाचे लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश पै निर्माते आहेत. निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल सहनिर्माते आहेत.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content