Homeपब्लिक फिगरकृषी मंत्री मुंडे...

कृषी मंत्री मुंडे यांनी पाठवली ‘त्या’ शेतकऱ्याकडे बैलजोडी

शेतात हळद लावण्याआधी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून भावाला व मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी बालाजी पुंडगे यांना काल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बांधावर बैलजोडी भेट पाठवली.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैलजोडी घेणे परवडत नाही आणि ऐनवेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाईगडबडीत सरी काढण्यासाठी त्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काहींनी आवाहनही केले होते.

बैलजोडी

या आवाहनाची दखल घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर काल मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले.

दरम्यान मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैलजोडी पाठवत असून शेतातल्या कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठीही अर्ज करावा, असे पुंडगे यांना सांगितले. बालाजी पुंडगे यांनीसुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्येसुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू, असा शब्द मुंडे यांना दिला. यावेळी बी. डी. बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी शिरळे गावात उपस्थित होते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content