Monday, May 12, 2025
Homeपब्लिक फिगरकृषी मंत्री मुंडे...

कृषी मंत्री मुंडे यांनी पाठवली ‘त्या’ शेतकऱ्याकडे बैलजोडी

शेतात हळद लावण्याआधी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून भावाला व मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी बालाजी पुंडगे यांना काल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बांधावर बैलजोडी भेट पाठवली.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैलजोडी घेणे परवडत नाही आणि ऐनवेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाईगडबडीत सरी काढण्यासाठी त्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काहींनी आवाहनही केले होते.

बैलजोडी

या आवाहनाची दखल घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर काल मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले.

दरम्यान मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैलजोडी पाठवत असून शेतातल्या कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठीही अर्ज करावा, असे पुंडगे यांना सांगितले. बालाजी पुंडगे यांनीसुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्येसुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू, असा शब्द मुंडे यांना दिला. यावेळी बी. डी. बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी शिरळे गावात उपस्थित होते.

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content