Homeपब्लिक फिगरकृषी मंत्री मुंडे...

कृषी मंत्री मुंडे यांनी पाठवली ‘त्या’ शेतकऱ्याकडे बैलजोडी

शेतात हळद लावण्याआधी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून भावाला व मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी बालाजी पुंडगे यांना काल राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बांधावर बैलजोडी भेट पाठवली.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैलजोडी घेणे परवडत नाही आणि ऐनवेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाईगडबडीत सरी काढण्यासाठी त्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काहींनी आवाहनही केले होते.

बैलजोडी

या आवाहनाची दखल घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर काल मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले.

दरम्यान मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैलजोडी पाठवत असून शेतातल्या कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टरसाठीही अर्ज करावा, असे पुंडगे यांना सांगितले. बालाजी पुंडगे यांनीसुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्येसुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू, असा शब्द मुंडे यांना दिला. यावेळी बी. डी. बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी शिरळे गावात उपस्थित होते.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content