Homeएनसर्कलसणासुदीच्या काळात देशांतर्गत...

सणासुदीच्या काळात देशांतर्गत विमानांची अतिरिक्त उड्डाणे

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता देशांतर्गत विमानसेवा पुरविणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांनी या काळात शेकडो अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने काल हवाई प्रवास शुल्कविषयक आढावा घेतला. अनेक विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे न करता विमानसेवेच्या तिकीटदरात भरमसाठ वाढ करतात. त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत महासंचालनालयाने सक्रीय पुढाकार घेत विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करत क्षमता वाढविण्यास सांगितले. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत विमान कंपन्यांनी खालीलप्रमाणे अतिरिक्त विमानसेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  1. इंडिगो: 42 मार्गांवर सुमारे 730 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
  2. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस: 20 मार्गांवर सुमारे 486 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
  3. स्पाईसजेट: 38 मार्गांवर सुमारे 546 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला हवाई प्रवास शुल्कावर लक्ष ठेवण्याचा, विशेषतः सणासुदीच्या काळात, दरात वाढ झाल्यास योग्य ती पाऊले उचलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांच्या दरांवर आणि विमानसेवा क्षमतेवर कठोर देखरेख ठेवणार आहे.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content