Homeएनसर्कलसणासुदीच्या काळात देशांतर्गत...

सणासुदीच्या काळात देशांतर्गत विमानांची अतिरिक्त उड्डाणे

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता देशांतर्गत विमानसेवा पुरविणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांनी या काळात शेकडो अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने काल हवाई प्रवास शुल्कविषयक आढावा घेतला. अनेक विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे न करता विमानसेवेच्या तिकीटदरात भरमसाठ वाढ करतात. त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत महासंचालनालयाने सक्रीय पुढाकार घेत विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करत क्षमता वाढविण्यास सांगितले. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत विमान कंपन्यांनी खालीलप्रमाणे अतिरिक्त विमानसेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  1. इंडिगो: 42 मार्गांवर सुमारे 730 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
  2. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस: 20 मार्गांवर सुमारे 486 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.
  3. स्पाईसजेट: 38 मार्गांवर सुमारे 546 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला हवाई प्रवास शुल्कावर लक्ष ठेवण्याचा, विशेषतः सणासुदीच्या काळात, दरात वाढ झाल्यास योग्य ती पाऊले उचलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांच्या दरांवर आणि विमानसेवा क्षमतेवर कठोर देखरेख ठेवणार आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content