Homeकल्चर +मनाला गुंतवून ठेवणारं...

मनाला गुंतवून ठेवणारं कोवळं प्रेमगीत ‘झोका’ प्रदर्शित

प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाचं एक हळवं गीत “झोका” आता प्रदर्शित झालंय. प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेलं हे नवीन मराठी रोमान्टिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये चित्रित झालेलं हे गाणं प्रेमाच्या कोवळ्या भावना आणि नाजूक क्षणांची प्रभावी पद्धतीने मांडणी करतं.

हे गाणं निसर्गाच्या साक्षीने उलगडणाऱ्या एका प्रेमकथेचे सुंदर चित्रिकरण आहे. प्रेमाच्या आठवणींना जागवणारे शब्द आणि सोपं पण सुंदर संगीत या गाण्याची खासियत आहे. गायक-गायिकेचा आवाज आणि त्यांच्या भावना आपल्याला प्रेमातली ती पहिली झोक्याची क्षणं आठवायला लावतात. मराठीत अशा प्रकारचं दृश्य आणि भावनिक सादरीकरण खरंच कौतुकास्पद आहे. हे गाणं नव्या पिढीच्या प्रेमकथेचं एक सुंदर दर्शन घडवतं. ह्या गाण्याचे गायक राजेश्वरी पवार आणि ओंकारस्वरूप आहेत तर संगीतकारही ओंकारस्वरूप आहे, गीतकार सुहास मुंडे आहेत. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांचंच आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांनी भरलेला “सजना” हा सिनेमा येत्या २७ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content