HomeArchiveसेंद्रीय खतांचे फायदेः...

सेंद्रीय खतांचे फायदेः रविवारी मुंबईत ‘किसान दौड’

Details
सेंद्रीय खतांचे फायदेः रविवारी मुंबईत ‘किसान दौड’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

कँसरचा धोका हवा, पाणी, जमीन यांच्यातील प्रदूषणामुळे वाढतो आणि त्याचा परिणाम जेवणातून होतो. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावित म्हणून वापरण्यात येणारी रसायनं, यामुळे एकूणच मानवी जीवन धोक्यात आले आहे. या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधावं तसंच शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही सेंद्रीय शेतीचे फायदे समजवून सांगावेत म्हणून येत्या रविवारी म्हणजेच २३ डिसेंबरला मुंबईत शिवाजी पार्क येथे ‘होश’ या “किसान दौड”चं आयोजन करण्यात आलं आहे.
अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या किसान दौड’मध्ये टाटा कँसर हॉस्पिटल तसंच समाजातील अन्य मान्यवरांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती अंबागोपाल फाउंडेशनचे संस्थापक हरीश शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

आपलं जीवन पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. यातील हवा, पाणी, जमीन ही तत्वंच प्रदूषित झाली आहेत. यामुळे येत्या काळात आपल्याला घरोघरी कँसरचे पेशंट दिसणार आहेत. हा धोका टाळायचा असेल तर आपण स्वत: आणि समाजालाही जागृत करण्यासाठी हरीश शेट्टी यांनी “होश” ही मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त सेंद्रीय पद्धतीने शेती केली पाहिजे, ग्राहकांनीही सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य खाल्लं पाहिजे आणि विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य सर्वांना परवडेल अशा पद्धतीने उपलब्धही झाले पाहिजे, यासाठीहोश’च्या माध्यमातून शेट्टी जनजागृती करत आहेत. आजपर्यंत अनेक न्यायाधीश, अधिकारी, रूग्णालये, महाविद्यालये, सामान्य नागरिक यांनी या मोहीमेला समर्थन दर्शवलं आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखों लोकांपर्यंत हा विषय पोहोचवला आहे.

सुमारे १० हजार शेतकरी आणि युवक २३ डिसेंबरला किसान दिनाच्या निमित्ताने आयोजित या “किसान दौड”मध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईच्या टाटा रूग्णालयात उपचार घेणारे जवळपास २०० रूग्णही यात सहभागी येणार आहेत. दूषित अन्नसाखळीमुळे वाढत चाललेला कँसरचा धोका टाळायचा असेल तर आजच केमिकलयुक्त अन्न आपण बंद केलं पाहिजे यासाठी सर्वांनी दबावगट निर्माण केला पाहिजे, असा संदेश या दौडच्या निमित्ताने देण्यात येणार आहे. येत्या काळात केमिकलयुक्त अन्न उत्पादनावरच बंदी आणायला हवी यासाठी एक पिटीशनही होशच्या वतीने न्यायालयात दाखल केली जाणार आहे.

२३ डिसेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथून सकाळी ७ वाजता ही “किसान दौड” सुरू होणार आहे, तरी या दौड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी, संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरीश शेट्टी यांनी केलं आहे. ज्यांना या दौडमध्ये सहभागी व्हायचे आहे, होशच्या कामात आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी ९१६७३५२७७२ या क्रमांकावर संपर्क करावा अशी माहीती हरीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

कँसरचा धोका हवा, पाणी, जमीन यांच्यातील प्रदूषणामुळे वाढतो आणि त्याचा परिणाम जेवणातून होतो. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावित म्हणून वापरण्यात येणारी रसायनं, यामुळे एकूणच मानवी जीवन धोक्यात आले आहे. या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधावं तसंच शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही सेंद्रीय शेतीचे फायदे समजवून सांगावेत म्हणून येत्या रविवारी म्हणजेच २३ डिसेंबरला मुंबईत शिवाजी पार्क येथे ‘होश’ या “किसान दौड”चं आयोजन करण्यात आलं आहे.
अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या किसान दौड’मध्ये टाटा कँसर हॉस्पिटल तसंच समाजातील अन्य मान्यवरांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती अंबागोपाल फाउंडेशनचे संस्थापक हरीश शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

आपलं जीवन पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. यातील हवा, पाणी, जमीन ही तत्वंच प्रदूषित झाली आहेत. यामुळे येत्या काळात आपल्याला घरोघरी कँसरचे पेशंट दिसणार आहेत. हा धोका टाळायचा असेल तर आपण स्वत: आणि समाजालाही जागृत करण्यासाठी हरीश शेट्टी यांनी “होश” ही मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त सेंद्रीय पद्धतीने शेती केली पाहिजे, ग्राहकांनीही सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य खाल्लं पाहिजे आणि विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य सर्वांना परवडेल अशा पद्धतीने उपलब्धही झाले पाहिजे, यासाठीहोश’च्या माध्यमातून शेट्टी जनजागृती करत आहेत. आजपर्यंत अनेक न्यायाधीश, अधिकारी, रूग्णालये, महाविद्यालये, सामान्य नागरिक यांनी या मोहीमेला समर्थन दर्शवलं आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखों लोकांपर्यंत हा विषय पोहोचवला आहे.

सुमारे १० हजार शेतकरी आणि युवक २३ डिसेंबरला किसान दिनाच्या निमित्ताने आयोजित या “किसान दौड”मध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईच्या टाटा रूग्णालयात उपचार घेणारे जवळपास २०० रूग्णही यात सहभागी येणार आहेत. दूषित अन्नसाखळीमुळे वाढत चाललेला कँसरचा धोका टाळायचा असेल तर आजच केमिकलयुक्त अन्न आपण बंद केलं पाहिजे यासाठी सर्वांनी दबावगट निर्माण केला पाहिजे, असा संदेश या दौडच्या निमित्ताने देण्यात येणार आहे. येत्या काळात केमिकलयुक्त अन्न उत्पादनावरच बंदी आणायला हवी यासाठी एक पिटीशनही होशच्या वतीने न्यायालयात दाखल केली जाणार आहे.

२३ डिसेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथून सकाळी ७ वाजता ही “किसान दौड” सुरू होणार आहे, तरी या दौड मध्ये जास्तीत जास्त लोकांनी, संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरीश शेट्टी यांनी केलं आहे. ज्यांना या दौडमध्ये सहभागी व्हायचे आहे, होशच्या कामात आपला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी ९१६७३५२७७२ या क्रमांकावर संपर्क करावा अशी माहीती हरीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.”

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content