HomeArchiveऑगस्ट क्रांती दिनानिमित्त...

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लोढा यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली!

Details
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लोढा यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारत छोडो आंदोलनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पित करून शहिदांचे स्मरण केले. ९ ऑगस्ट १९४२ साली भारतीय स्वतंत्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत याच मैदानातून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ हा नारा दिला. याप्रसंगी मलबार हिलचे आमदार लोढा म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदानसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रातून ते आमदार असल्याचा त्यांना अभिमान आहे.

 
ऑगस्ट क्रांती नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात इंग्रजांविरूद्ध आंदोलनाची सुरूवात केली असल्याने, या घटनेचे स्मरण करून दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ‘भारत छोडो आंदोलन’ म्हणून नोंदविला गेला आहे. शुक्रवारी याच क्रांतिकारी घटनेचा ७७ वा वर्धापन दिवस होता. काल संक्रांतीस्थळी श्रद्धासुमन कार्यक्रमात यांच्यासह दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनसहित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारत छोडो आंदोलनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पित करून शहिदांचे स्मरण केले. ९ ऑगस्ट १९४२ साली भारतीय स्वतंत्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत याच मैदानातून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ हा नारा दिला. याप्रसंगी मलबार हिलचे आमदार लोढा म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदानसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रातून ते आमदार असल्याचा त्यांना अभिमान आहे.

 
ऑगस्ट क्रांती नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात इंग्रजांविरूद्ध आंदोलनाची सुरूवात केली असल्याने, या घटनेचे स्मरण करून दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ‘भारत छोडो आंदोलन’ म्हणून नोंदविला गेला आहे. शुक्रवारी याच क्रांतिकारी घटनेचा ७७ वा वर्धापन दिवस होता. काल संक्रांतीस्थळी श्रद्धासुमन कार्यक्रमात यांच्यासह दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनसहित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content