HomeArchiveविधानसभेत डावलल्यास स्वतंत्र...

विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी

Details
विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी

    19-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.
 
कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.
 
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
 
 
याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.”

 
“कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.”

 
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
 
 
“याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content