Details
ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जनस्थान पुरस्कार जाहीर!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
ज्येष्ठ लेखक, साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना मराठी साहित्य वर्तुळात महत्त्वाचा मानला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप असून येत्या २७ फेब्रुवारीला नाशिक येथे सभारंभपूर्वक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मंगळवारी केली.
वसंत आबाजी डहाके यांचे योगभ्रष्ट, शुभवर्तमान, चित्रलिपी, वाचाभंग हे कवितासंग्रह, यात्रा-अंतर्यात्रा व मालटेकडीवरून हे लेखसंग्रह, साहित्य आणि दृश्यकला यासारखे समीक्षालेखन प्रसिध्द झाले आहेत. तसेच मराठी वाड्मयकोशात त्यांनी मोलाची भर घातली असून समकालीन वास्तवाचे भान जागृत करणाऱ्या या लेखकाची जनस्थान पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले, रेखा इनामदार-साने आणि जयंत पवार यांचा या निवड समितीमध्ये समावेश होता. दर दोन वर्षांनी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदाचा हा १८ वा पुरस्कार असून यापूर्वी विजय तेंडूलकर, इंदिरा संत, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आदी ज्येष्ठ साहित्यिकांना देण्यात आला आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो
ज्येष्ठ लेखक, साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना मराठी साहित्य वर्तुळात महत्त्वाचा मानला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप असून येत्या २७ फेब्रुवारीला नाशिक येथे सभारंभपूर्वक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मंगळवारी केली.
वसंत आबाजी डहाके यांचे योगभ्रष्ट, शुभवर्तमान, चित्रलिपी, वाचाभंग हे कवितासंग्रह, यात्रा-अंतर्यात्रा व मालटेकडीवरून हे लेखसंग्रह, साहित्य आणि दृश्यकला यासारखे समीक्षालेखन प्रसिध्द झाले आहेत. तसेच मराठी वाड्मयकोशात त्यांनी मोलाची भर घातली असून समकालीन वास्तवाचे भान जागृत करणाऱ्या या लेखकाची जनस्थान पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले, रेखा इनामदार-साने आणि जयंत पवार यांचा या निवड समितीमध्ये समावेश होता. दर दोन वर्षांनी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदाचा हा १८ वा पुरस्कार असून यापूर्वी विजय तेंडूलकर, इंदिरा संत, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आदी ज्येष्ठ साहित्यिकांना देण्यात आला आहे.”

