HomeArchiveराजीवजी, शंकररावजी आणि...

राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..

Details
“राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content