Details
स्वप्नाक्षय मंडळाने साकारले प्रगतशील भारत
11-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतील वर्सोव्याच्या स्वप्नाक्षय मंडळाने प्रगतशील भारताचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक प्रकाश सिंह यांनी हा देखावा उभारला आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीवरील सर्व जातीधर्माचे लोक जर एकत्र आले तरच देशाची प्रगती होईल, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी ही माहिती दिली.
या मंडळाचे यंदा ३९वे वर्ष आहे. मूर्तिकार विजय बांदेकर यांनी कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची आकर्षक १० फूट मूर्ती तयार केली आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. देवेंद्र (बाळा) आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, संजीव (बिल्लू) कल्ले, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत, दिनेश गवलानी, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, विकी गुप्ता, नीलम गुप्ता, अमेय घाग, सोहम आंबेकर आदी कार्यकर्ते येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.
येथील देखाव्याबाबत आंबेकर यांनी सांगितले की, प्रबोधनाबरोबर यंदा प्रगतशील भारताच्या विकासाचे विविध टप्पे साकारले आहेत. मुंबई मेट्रो, काश्मीर रेल्वे पूल, रोहतांग टनेल, चांद्रयान आदी देखावे येथे साकारले आहेत. येथील देखाव्यातून जंगले वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान, शेतीच्या विकासाबरोबर जयजवान जय किसानचा नारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र जगता पहारा ठेवत शत्रूंचा बिमोड करण्यात सज्ज असलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या अभिमानास्पद कामगिरीला वंदन करण्यात आले आहे.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतील वर्सोव्याच्या स्वप्नाक्षय मंडळाने प्रगतशील भारताचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक प्रकाश सिंह यांनी हा देखावा उभारला आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीवरील सर्व जातीधर्माचे लोक जर एकत्र आले तरच देशाची प्रगती होईल, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी ही माहिती दिली.”
“या मंडळाचे यंदा ३९वे वर्ष आहे. मूर्तिकार विजय बांदेकर यांनी कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची आकर्षक १० फूट मूर्ती तयार केली आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. देवेंद्र (बाळा) आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, संजीव (बिल्लू) कल्ले, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत, दिनेश गवलानी, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, विकी गुप्ता, नीलम गुप्ता, अमेय घाग, सोहम आंबेकर आदी कार्यकर्ते येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.”
“येथील देखाव्याबाबत आंबेकर यांनी सांगितले की, प्रबोधनाबरोबर यंदा प्रगतशील भारताच्या विकासाचे विविध टप्पे साकारले आहेत. मुंबई मेट्रो, काश्मीर रेल्वे पूल, रोहतांग टनेल, चांद्रयान आदी देखावे येथे साकारले आहेत. येथील देखाव्यातून जंगले वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान, शेतीच्या विकासाबरोबर जयजवान जय किसानचा नारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र जगता पहारा ठेवत शत्रूंचा बिमोड करण्यात सज्ज असलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या अभिमानास्पद कामगिरीला वंदन करण्यात आले आहे.”

