HomeArchiveस्वप्नाक्षय मंडळाने साकारले...

स्वप्नाक्षय मंडळाने साकारले प्रगतशील भारत

Details
स्वप्नाक्षय मंडळाने साकारले प्रगतशील भारत

    11-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
  
मुंबईतील वर्सोव्याच्या स्वप्नाक्षय मंडळाने प्रगतशील भारताचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक प्रकाश सिंह यांनी हा देखावा उभारला आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीवरील सर्व जातीधर्माचे लोक जर एकत्र आले तरच देशाची प्रगती होईल, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी ही माहिती दिली.
 
 
या मंडळाचे यंदा ३९वे वर्ष आहे. मूर्तिकार विजय बांदेकर यांनी कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची आकर्षक १० फूट मूर्ती तयार केली आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. देवेंद्र (बाळा) आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, संजीव (बिल्लू) कल्ले, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत, दिनेश गवलानी, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, विकी गुप्ता, नीलम गुप्ता, अमेय घाग, सोहम आंबेकर आदी कार्यकर्ते येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.
 
 
येथील देखाव्याबाबत आंबेकर यांनी सांगितले की, प्रबोधनाबरोबर यंदा प्रगतशील भारताच्या विकासाचे विविध टप्पे साकारले आहेत. मुंबई मेट्रो, काश्मीर रेल्वे पूल, रोहतांग टनेल, चांद्रयान आदी देखावे येथे साकारले आहेत. येथील देखाव्यातून जंगले वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान, शेतीच्या विकासाबरोबर जयजवान जय किसानचा नारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र जगता पहारा ठेवत शत्रूंचा बिमोड करण्यात सज्ज असलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या अभिमानास्पद कामगिरीला वंदन करण्यात आले आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
  
“मुंबईतील वर्सोव्याच्या स्वप्नाक्षय मंडळाने प्रगतशील भारताचा देखावा साकारला आहे. कलादिग्दर्शक प्रकाश सिंह यांनी हा देखावा उभारला आहे. विविधतेने नटलेल्या भारतभूमीवरील सर्व जातीधर्माचे लोक जर एकत्र आले तरच देशाची प्रगती होईल, असा संदेश येथील देखाव्यातून देण्यात आला आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी ही माहिती दिली.”
 
 
“या मंडळाचे यंदा ३९वे वर्ष आहे. मूर्तिकार विजय बांदेकर यांनी कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची आकर्षक १० फूट मूर्ती तयार केली आहे. येथील देखावा बघण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. देवेंद्र (बाळा) आंबेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सरचिटणीस अशोक मोरे, संजीव (बिल्लू) कल्ले, माजी शाखाप्रमुख अनिल राऊत, दिनेश गवलानी, सुरेश बंगेरा, उमा ढेरे, विकी गुप्ता, नीलम गुप्ता, अमेय घाग, सोहम आंबेकर आदी कार्यकर्ते येथील गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.”
 
 
“येथील देखाव्याबाबत आंबेकर यांनी सांगितले की, प्रबोधनाबरोबर यंदा प्रगतशील भारताच्या विकासाचे विविध टप्पे साकारले आहेत. मुंबई मेट्रो, काश्मीर रेल्वे पूल, रोहतांग टनेल, चांद्रयान आदी देखावे येथे साकारले आहेत. येथील देखाव्यातून जंगले वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छ भारत अभियान, शेतीच्या विकासाबरोबर जयजवान जय किसानचा नारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून अहोरात्र जगता पहारा ठेवत शत्रूंचा बिमोड करण्यात सज्ज असलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या अभिमानास्पद कामगिरीला वंदन करण्यात आले आहे.”

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content