HomeArchiveओकिनावाद्वारे १०००हून अधिक...

ओकिनावाद्वारे १०००हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आर्थिक व्यवहारांसदर्भात सरकारने शिथिलता आणल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ब्रँड कार्यसंचालनापासून महिनाभरात १०००हून अधिक स्कूटर्सची विक्री केल्याची घोषणा केली आहे. या ब्रँडने भारतभरातील ३५० हून अधिक डिलर्सपैकी ६० ते ७० टक्‍के कार्यरत टचपॉईंट्सच्या माध्यमातून हा विक्री आकडा संपादित केला. कंपनीने कोविड-१९ प्रतिबंधासाठी २५ टक्‍के कर्मचारीवर्ग आणि सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत ११ मे २०२० रोजी अंशत: कार्यसंचालनांना सुरूवात केली. ओकिनावाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरच्या १ महिन्याच्या कार्यसंचालनामध्ये १२००हून अधिक वाहने पाठवली आहेत.
 
“हा ब्रँड त्यांच्या भागधारकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्व आवश्‍यक खबरदारीचे उपाय घेत आला आहे. उत्पादन युनिटमधील असेम्बलीमधून पाठवण्यापूर्वी सर्व उत्पादने सॅनिटाईझ केली जातात आणि डिलरशिप्समध्ये डिलर भागीदार उत्पादने मिळाल्यानंतर सॅनिटाईझ करतात. ओकिनावा आर्थिक वर्ष २०२०मधील भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे आणि भारतामध्ये १०,०००चा टप्पा पार करणारी एकमेव ईव्‍ही कंपनी आहे.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content