Homeकल्चर +.. अन्यथा जयंत...

.. अन्यथा जयंत एक धाडसी संपादक झाला असता!

जयंत पवार यांचा नाटक-कथाकार म्हणून लौकिक झाला असेलही. परंतु त्यांची नजर पत्रकाराची होती. संधी मिळाली असती तर ते एक धाडसी पत्रकार झाले असते, अशी खंत जयंत पवार यांच्या पत्नी संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पवार यांच्या अभिवादन सभेत त्यांनी ही खंत उघडपणे व्यक्त केली. लोकवाङ्मय गृह आणि विद्रोही चळवळीतर्फे ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. लोकवाङ्मय गृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या अभिवादन सभेस सर्व थरातील लोक उपस्थित होते. डावे होते, उजवे होते, विद्रोही होते, जयंतचे मित्र होते, चाहते होते, पत्रकार मित्र होते, कोण नव्हते तेव्हडे विचारा.. विशेष म्हणजे जयंतचे विचार आवडणारा युवावर्गही मोठया संख्येने उपस्थित होता.

या अभिवादन सभेस उपस्थित असणाऱ्यांनी जयंतकडे वेगळी नजर होती.. असा आवर्जून उल्लेख केला. खरेतर ती नजर पत्रकाराची होती म्हणून तर त्याला वेगळा विचार सुचत असे आणि त्याबरहुकूम तो लिहीत असे. त्याच्यातील समीक्षक, नाटक-कथाकाराला जितके उचलून धरले गेले तितकेच त्याच्यातील पत्रकाराला डावलले गेले असे मला सतत वाटत आले आहे, अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली.

साहित्यिक व नाटक वर्तुळात वावरणाऱ्या जयंतच्या वाटेस एखादे सदरही येऊ नये का? असा रास्त सवाल त्यांनी संबंधितांना विचारला. गेली काही वर्षे कर्करोगाशी सामना करताना ज्या मित्रांनी वेळोवेळी सहाय्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पुरस्कार वापसीच्या वेळी जयंतने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे जवळच्या मित्रांनीही केलेल्या टीकाटिप्पणीबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

रंगकर्मी मंगेश कदम व विजय केंकरे यांनी जयंतच्या मैत्रीसंदर्भात काही आठवणी सांगितल्या. कोणाला कोणती भूमिका सूट होईल हे जयंत अचूक ओळखत असे, या शब्दात मंगेश कदम यांनी आदर व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी आपल्या जिवलग मित्राबाबत काही आठवणी सांगितल्या. जयंत शांत बसून काहीही ऐकून घेत असे, हे आपल्याला बिलकुल आवडत नसे, असे समर यांनी स्पष्ट केले. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनीही आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याला आदरांजली वाहिली. ज्येष्ठ रंगकर्मी शहाफत खान यांनीही जयंतच्या नाट्यलेखनाचा गौरव केला. लोकवाङ्मय गृहाचे राजन बावडेकर यांनी समारोप केला.

लोककवाङ्मय गृहाने अलीकडच्या काळात आयोजित केलेल्या चांगल्या कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम ठरावा. (कोरोना काळात कार्यक्रम बंद होते. परंतु त्याआधीचा काळ गृहीत धरला आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.)

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content