Homeकल्चर +.. अन्यथा जयंत...

.. अन्यथा जयंत एक धाडसी संपादक झाला असता!

जयंत पवार यांचा नाटक-कथाकार म्हणून लौकिक झाला असेलही. परंतु त्यांची नजर पत्रकाराची होती. संधी मिळाली असती तर ते एक धाडसी पत्रकार झाले असते, अशी खंत जयंत पवार यांच्या पत्नी संध्या नरे-पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पवार यांच्या अभिवादन सभेत त्यांनी ही खंत उघडपणे व्यक्त केली. लोकवाङ्मय गृह आणि विद्रोही चळवळीतर्फे ही अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. लोकवाङ्मय गृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या अभिवादन सभेस सर्व थरातील लोक उपस्थित होते. डावे होते, उजवे होते, विद्रोही होते, जयंतचे मित्र होते, चाहते होते, पत्रकार मित्र होते, कोण नव्हते तेव्हडे विचारा.. विशेष म्हणजे जयंतचे विचार आवडणारा युवावर्गही मोठया संख्येने उपस्थित होता.

या अभिवादन सभेस उपस्थित असणाऱ्यांनी जयंतकडे वेगळी नजर होती.. असा आवर्जून उल्लेख केला. खरेतर ती नजर पत्रकाराची होती म्हणून तर त्याला वेगळा विचार सुचत असे आणि त्याबरहुकूम तो लिहीत असे. त्याच्यातील समीक्षक, नाटक-कथाकाराला जितके उचलून धरले गेले तितकेच त्याच्यातील पत्रकाराला डावलले गेले असे मला सतत वाटत आले आहे, अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली.

साहित्यिक व नाटक वर्तुळात वावरणाऱ्या जयंतच्या वाटेस एखादे सदरही येऊ नये का? असा रास्त सवाल त्यांनी संबंधितांना विचारला. गेली काही वर्षे कर्करोगाशी सामना करताना ज्या मित्रांनी वेळोवेळी सहाय्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पुरस्कार वापसीच्या वेळी जयंतने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे जवळच्या मित्रांनीही केलेल्या टीकाटिप्पणीबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

रंगकर्मी मंगेश कदम व विजय केंकरे यांनी जयंतच्या मैत्रीसंदर्भात काही आठवणी सांगितल्या. कोणाला कोणती भूमिका सूट होईल हे जयंत अचूक ओळखत असे, या शब्दात मंगेश कदम यांनी आदर व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी आपल्या जिवलग मित्राबाबत काही आठवणी सांगितल्या. जयंत शांत बसून काहीही ऐकून घेत असे, हे आपल्याला बिलकुल आवडत नसे, असे समर यांनी स्पष्ट केले. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनीही आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याला आदरांजली वाहिली. ज्येष्ठ रंगकर्मी शहाफत खान यांनीही जयंतच्या नाट्यलेखनाचा गौरव केला. लोकवाङ्मय गृहाचे राजन बावडेकर यांनी समारोप केला.

लोककवाङ्मय गृहाने अलीकडच्या काळात आयोजित केलेल्या चांगल्या कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम ठरावा. (कोरोना काळात कार्यक्रम बंद होते. परंतु त्याआधीचा काळ गृहीत धरला आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.)

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content