Homeकल्चर +‘उधार का उजाला’चे...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे प्रकाशक संदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली.

या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर असतील. ज्येष्ठ कवी आणि अभिनेते किशोर कदम, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. ‘उधार का उजाला’, या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने काव्यरसिकांसाठी विशेष काव्य अभिवाचनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे हे या पुस्तकातील निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे करणार आहेत.

संवेदनशील भावविश्व मांडणाऱ्या ‘उधार का उजाला’च्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन सदामंगल पब्लिकेशनतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...

एसआयआरसाठी लागणारी माहिती जमा करा ८ ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्रात सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदारयादीतील सर्व मतदारांनी येत्या ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीला येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले...
Skip to content