Homeएनसर्कलमॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय...

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय स्पर्धकाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 67 सहभागी देशांमध्ये सहावे स्थान पटकाविले. 2015मध्ये ऑलिम्पियाडमध्ये पदार्पण केल्यापासून भारताची ही सर्वोच्च क्रमवारी आणि कामगिरी आहे. ही स्पर्धा 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत फ्रान्समधील बोर्दोमध्ये आयोजित करण्यात आली होती.

पदकविजेत्या मुलींची नावे पुढीलप्रमाणे-

अनुक्रमांक  नाव राज्यपुरस्कार
1श्रेया मुंदडामुंबई, महाराष्ट्रसुवर्णपदक
2संजना चॅकोकेरळरौप्यपदक
3शिवानी कुमारतमिळनाडूकांस्यपदक

भारतीय संघाचे नेतृत्त्व डॉ. वैदेही थत्ते (नेता), डॉ. मृदुल थत्ते (उपनेता) आणि अदिती मुठखोड (निरीक्षक) यांनी केले. विशेष म्हणजे, भारताने या स्पर्धेसाठी संपूर्ण महिला संघ पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. या स्पर्धेत 67 देशांच्या 260 विद्यार्थिंनींनी भाग घेतला. यामध्ये 42 युरोपीय देशांमधील 161 सहभागींचा समावेश आहे. भारत 2015पासून या ऑलिम्पियाडमध्ये अतिथी राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे. भारतीय स्पर्धकांना माजी ऑलिम्पियन, अग्रगण्य गणित संशोधन संस्थांमधील संशोधक आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहाय्य असून, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत राष्ट्रीय उच्च गणित मंडळ यांचे सातत्यपूर्ण पाठबळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content