Homeमुंबई स्पेशलधर्मानुरागी जिनमती शाह...

धर्मानुरागी जिनमती शाह यांचे निधन

धर्मानुरागी जिनमती शाह यांचे काल मुंबईतल्या प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा, नातवंडे आदी मोठा परिवार आहे. जिनमती यांच्या पार्थिवावर दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, ब्रिच कॅंण्डी, ताडदेव परिसरातील उद्योजक, साहित्यिक, व्यापारी आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जिनमती यांचे पुढील बेस्ना, उठामणा आदी तत्सम कार्यक्रम होणार नाहीत. त्या बारामतीतील प्रसिद्ध शेठ चंदुकाका सराफ यांची कन्या, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका बीना शाह यांच्या मातोश्री तसेच फलटणचे धनाढ्य व्यापारी व जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शाह यांच्या पत्नी होत. मुंबईतून प्रसिद्ध होणारी अनेक दैनिक, साप्ताहिके व पाक्षिकांची छपाई त्यांच्या वरळीतील छपाई कारखान्यात केली जात असे. बोरीवली, संजय गांधी उद्यानातील पोदनपुरा या जैन मंदिराचे त्या संस्थापक विश्वस्त होत्या. त्यांनी काही एकर जमीन मंदिरास दानही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content