Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला...

महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो!

अहो पालिका आयुक्त, महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो… स्थळः ठाण्यातला तीन पेट्रोल पम्प परिसर. नेमकं ठिकाण विष्णुनगर पोलीस चौकीला लागूनच! अगदी पाच पावलावर! महाराष्ट्रगीत तसेच अनेक आजरामर नाट्यकृतींनी तमाम महाराष्ट्राला माहित असलेलं लाडकं नाव म्हणजे रामगणेश गडकरी!! ठाणे शहरात त्यांच्या गौरवार्थ गडकरी रंगायतन हे नाट्यगृहही आहे. अशी सर्व परिस्थिती असताना त्यांच्या नावाचा फलक पालिका कचरा कुंडीच्या जवळ असावा हे संतापजनकच नव्हे तर कविकुलाचा अपमान करणारेच कृत्य आहे. खरंतर या चुकीला माफी नाहीच!!

शहरातील कचराही हटवला गेला पाहिजे हे मान्य आहे. पण भाषाप्रभुच्या फलकाशेजारी कचऱ्याने बरबटलेली लक्तरे व कचरा आजबाजूला फेकलेला असणे कितपत योग्य आहे याचा विचार आजूबाजूला राहणाऱ्या आणि ‘आनंद’ नावाच्या मिजाशीत वावरणाऱ्या सर्वांनाच लाजेने माना खाली घालायला लावणारा आहे.

“मंगलदेशा पवित्र देशा! महाराष्ट्र देशा|

प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा||

असे अवीट गीत लिहिणाऱ्या कवीच्या वाटेला अशी अरसिक पालिका येऊ नये असे मनोमन वाटते. कवी पुढे म्हणतात…

“शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरीच्या देशा|

पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्याच्या देशा||”

अशा गोड शब्दांत राज्याचे वर्णन करणाऱ्या कवीच्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय हे पाहिल्यावर डोक्याचा लोच्याच झाला नाही तरच नवल! ‘कल्पनेचे धाडस व चमत्कृती हा जर काव्याचा एक मुख्य गुण मानला तर त्याबाबतीत गडकऱ्यांची बरोबरी करणारे किती निघतील, असा प्रश्न टाकण्यात मुळीच हरकत नाही’ अशी प्रशंसा खुद्द तत्कालीन केसरी व मराठाचे संपादक, प्रख्यात साहित्यिक न. चिं. केळकर यांनी केली होती. हे गडकरींचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारीच होती हे कोण अमान्य करेल?

Continue reading

आचार्य अत्रे यांनी जखम होऊ न देता केलेली गुळगुळीत दाढी!

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. अशा या महान साहित्यकाराच्या लेखणीतून जन्मलेल्या 'झेंडूची फुले' या विडंबनात्मक काव्याला 100...

आतातरी एकनाथरावांना पडली ठाण्याची चिंता! हेही नसे थोडके!!

एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते 'चिंता करतो राज्याची..' या भूमिकेत होते. उपमुख्यमंत्री झाल्यापासून 'चिंता करतो पक्षाची!', या भूमिकेत आल्यासारखे वाटते. आणि कालपरवा त्यांना चक्क 'चिंता वाटते ठाण्याची..' या भूमिकेपर्यंत बदल झाल्यासारखे दिसत आहे. ठाणेकरांना त्याचा प्रत्यय येईल...

मराठी पाऊल.. किती काळ गाणार ही रुदाली?

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन व बोधगया यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे-मागे' या नेहमीच्याच विषयावर चर्चा ठेवली हॊती. कादंबरी प्रकाशित...
Skip to content