Homeकल्चर +'नारी तू नारायणी' हे...

‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य नको!

आधुनिक शिक्षण महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्त्व हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक स्त्रीने आपल्या परीने सामाजिक, राष्ट्रीय समानता ठेवून कार्य केले पाहिजे, असे विचार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले.

विश्वभरारी फाऊंडेशन आयोजित भरारी प्रकाशनच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, या लता गुठे यांनी लिहिलेल्या आणि संचित संस्कृतीचे या लेखिका स्मिता भागवत लिखित पुस्तकांचे प्रकाशन झाले. गेल्या ७ वर्षांत प्रकाशित झालेले भरारी प्रकाशनचे हे ३००वे पुस्तक आहे. आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, प्रकाशिका लता गुठे, माध्यम सल्लागार जयू भाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशभक्ती हा रोजच्या जगण्यातील विषय आहे. प्रत्येकाने समाजासाठी आणि देशासाठी जेवढे काही करता येईल, तेवढे चांगले काम करावे, असे विचार आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केले. लता गुठे यांच्या प्रकाशन क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत यापुढील पुस्तक `क्रांतिकारकांच्या घरच्यांचे जीवन’ या विषयावर प्रकाशित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

`जगणं आमचं’ कार्यक्रमांतर्गत माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना वीरमाता अनुराधा गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेणुका बुवा आणि प्रकाशिका लता गुठे यांनी उत्तरे दिली. कॅ. विनायक गोरे यांच्या वीरमरणानंतर असंख्य विनायक तुझी वाट पहात आहेत, हे मुख्याध्यापकांचे वाक्य परिणाम करून गेले आणि क्षितिजामागून क्षितिजे उलगडत गेली. संकटात अदृश्य शक्ती साथ देते, असे विचार अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. शारीरिक आणि मानसिक फिटनेस हा पोलिसांच्या जीवनात आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत रेणुका बुवा यांनी २६-११ हल्ल्यात केलेल्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला. मीच माझी गुरु आणि मीच माझी शिष्य या भावनेतून काम करून प्रकाशन आणि साहित्यिक क्षेत्रात आलेले अनुभव लता गुठे यांनी कथन केले.

डॉ. संपदा पाटगावकर यांनी लता गुठे लिखित स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, पुस्तकातील उताऱ्याचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले. सायली वेलणकर यांनी प्रारंभी गणेश आणि शारदा वंदना सादर केली.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content