Homeमाय व्हॉईसनिवडणुकांच्या कामासाठी जाऊ...

निवडणुकांच्या कामासाठी जाऊ नका! काय होते ते मी पाहतो!!

तुम्ही निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरमधले शिक्षक आपल्याला भेटले. त्यांनी निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीच्या कामासाठी बोलावल्याचे सांगितले. चार हजारांहून जास्त शिक्षकांना आयोगाने बोलावले आहे. हे शिक्षक तेथे गेले तर विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण घेणार? त्यामुळे या शिक्षकांना आपण आयोगाच्या कामासाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. आमचे प्रतिनिधी लवकरच निवडणूक आयोगाशी चर्चा करेल आणि यावर मार्ग काढेल, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामे करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल त्यांनी केला. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवे आहेत. हे शिक्षक कशासाठी हवेत? निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो? तुम्हाला पाच वर्षांत यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोक लागणार, ते तुम्हाला माहिती नाही? शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content