Homeमुंबई स्पेशलशिक्षणाधिकारी राजेश कंकाळ...

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार

शैक्षणिक विषयात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना नुकतेच गौरविण्यात आले.

सन २०२२-२३करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (NIEPA-National Institute of Educational Planning and Administration), नवी दिल्ली या उच्चतम संस्थेद्वारा कंकाळ यांना गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथील भीम सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते व केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार, NIEPAचे कुलपती महेशचंद्र पंत, उपकुलपती शशिकला वंजारी, कार्यक्रम संचालक कुमार सुरेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कंकाळ

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ अशा विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत पालिकेच्या आठ माध्यमाच्या १२१४ शाळा व ११३४ बालवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये सुमारे १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. नवीन प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन मेरिट’ राबविण्यात येत आहे.

शिक्षण विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्राचे शिक्षक आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाचे परीक्षण करून राज्य स्तरावरून शिफारस करण्यात आली. यानंतर केंद्र शासनाच्या स्तरावर संगणकीय सादरीकरण व मुलाखत घेण्यात आली. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करत पालिकेच्या शिक्षण विभागाला शिक्षण क्षेत्रातील प्रशासन देखरेख करणाऱ्या अतिउच्च यंत्रणेकडून हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content