Homeपब्लिक फिगरराजस्थानमध्ये पंतप्रधानांनी केले...

राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी केले ६ एकलव्य निवासी शाळांचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील उदयपूर (2), बांसवाडा (2), प्रतापगड (1) आणि डुंगरपूर या जिल्ह्यातील सहा एकलव्य आदर्श निवासी शाळांचे नुकतेच उद्घाटन केले. या शाळांच्या बांधकामामुळे 2880 आदिवासी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यात विद्यार्थिनींची संख्या अर्धी आहे.

अनेक दशकांपासून खेड्यांमध्ये चांगल्या शाळा आणि शिक्षणाच्या अभावामुळे खेडी आणि गरीब लोक मागे पडल्याचे पंतप्रधान म्हणाले आणि मागासलेल्या आणि आदिवासी समाजातील मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, सध्याच्या सरकारने शिक्षणासाठी आर्थिक तरतूद आणि संसाधने वाढवली आणि एकलव्य निवासी शाळा उघडल्या ज्याचा आदिवासी तरुणांना मोठा फायदा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, 50% किंवा 20,000 हून अधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या आदिवासी तालुक्यात प्रत्येकी एक प्रमाणे 740 एकलव्य निवासी आदर्श शाळा स्थापन केल्या जात आहेत. 2021-22 मध्ये 452 नवीन मैदानी आणि डोंगराळ भागातील एकलव्य आदर्श निवासी शाळांसाठी बांधकामाची किंमत अनुक्रमे 20 कोटी आणि 24 कोटी रुपयांवरून वाढवून 38 कोटी आणि 48 कोटी रुपये करण्यात आली. पुढील 3 वर्षांत टप्प्याटप्प्याने 38,000 हून अधिक शिक्षकांची भर्ती केली जाईल. 2013-14 मध्ये 167 शाळांना मंजुरी देण्यात आली होती, ज्या आजपर्यंत 693 पर्यंत वाढल्या आहेत. 2013-14 मध्ये 119 शाळा कार्यरत होत्या, तर आजमितीस 401 शाळा कार्यरत आहेत, गेल्या 5 वर्षात 110 शाळांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content