Homeचिट चॅटआयसीएसई (१०वी) व...

आयसीएसई (१०वी) व आयएससी (१२वी) परीक्षांमध्ये मुलींची बाजी!

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई), या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल ९८.९४ टक्के लागला आहे तर आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. आयसीएसई (दहावी)च्या निकालामध्ये मुलींनी चांगली कामगिरी बजावली असून यात मुलींचे पास होण्याचे प्रमाण ९९.२१ टक्के आहे तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९८.७१ टक्के आहे. तसेच आयएससी (बारावी)च्या निकालांमध्येही मुलींनी बाजी मारली असून ९८.०१ टक्के मुली पास झाल्या आहेत तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.     

आयसीएसई (दहावी)च्या निकालांमध्ये भारतात पश्चिम भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.८१ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यापाठोपाठ दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.६९ टक्के आहे. आयएससी (बारावी)च्या निकालांमध्ये दक्षिण भागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून या भागातील ९९.२० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यापाठोपाठ पश्चिम विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९८.३४ टक्के आहे.

मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते, जे निकालाची वाट पाहत होते. अखेर काल दुपारी तीन वाजता निकाल जाहीर झाले. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा २१ मेपर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content