HomeArchiveअण्णा पाहिजेत, पण..

अण्णा पाहिजेत, पण..

Details
“अण्णा पाहिजेत, पण..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी केलेल्या २ जी, ३ जी, कोळसा खाणीचा लिलाव आदी भ्रष्टाचारांची प्रकरणे गाजत होती. लोकांमध्येही जबरदस्त सरकारविरोधी चीड होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये सहानुभूती होती. केंद्र सरकारमध्ये एवढा भ्रष्ट्राचार होत असताना डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंह गप्प का? ते भ्रष्ट्राचारविरोधात कारवाई का करत नाहीत? अशी लोकांमध्ये त्यांच्याविषयी चीडही होती. परंतु भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे हात फार लांब असतात. लांब असणे म्हणजे त्यांचे हात राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेले असतात म्हणूनच कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराला राजकीय आसरा मिळत असल्याने सरकारविरोधी लोकांनी बेंबीच्या देठापासून ओरडून काहीही उपयोग नाही, हीच खरी लोकांची मानसिकता तयार झालेली असते. मात्र, त्यावेळी अण्णा नावाचा हजारातला एक माणूस पुढे आला. त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंम्मत तत्कालीन सरकारने दाखवली आणि ते लोकांचे खरे हिरो झाले.

“मै अण्णा हूँ” अशा टोप्या घालून लोक तत्कालीन सरकारवर प्रचंड नाराज झाले होते. त्यावेळी खूषमस्कऱ्यांचीही झुंबड अण्णाभोवती जमा लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अण्णांच्या उपोषणाच्या जागी कामाला लागले. ज्यांना निवडणुकीत काही उमेदवार निवडून आणावयाचे होते त्यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाचे फलित आहे. त्याशिवाय सनदी अधिकारी किरण बेदी अण्णांच्या मागे उभ्या होत्या. तेही तिरंगा झेंडा हातात घेऊन उजव्या-डाव्या बाजूला हलवून आम्ही भ्रष्टयाचाराचे खरे विरोधक अशाप्रकारे देशवासियांसमोर स्वतःची प्रतिमा तयार करत होत्या. त्यांना मोदी सरकारने राज्यपाल करून भ्रष्टाचारविरोधकांची म्हणजेच अण्णाच्या गोटातील उपद्रवी किरण बेदी यांना जाळ्यात ओढले.

 

काँग्रेस सरकारच्या कालावधीत लोकपाल नेमण्यासाठी अण्णांचा आग्रह मान्य करण्यात आला त्यानंतर अण्णांना पाठींबा देणारे भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदी सरकारला पाच वर्षे होत आली परंतु केंद्र सरकारने पाच वर्षांत लोकपाल नेमण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. वैशिष्टय म्हणजे अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला पाच वर्षांत ३५ वेळा पत्रे लिहून स्वतःची जबाबदारी पार पाडली आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत उपोषणाला न बसता राळेगणसिद्धी हे छोटेसे गाव निवडले. अण्णा हजारेंवर दिल्लीऐवजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याची वेळ का आली, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि राग होता. नेमके त्याचवेळी अण्णांचा उपोषणाचा निर्धार, यात अनेकांना राजकीय भविष्य घडविण्याचा संधी दिसू लागली. काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचायची ही संधी ओळखून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपोषण कार्यक्रमाला हातभार लावायला सुरूवात केली आणि संधीचं सोनं करायचा इरादा पक्का केला. रामलीला मैदानावर लोकांची गर्दी पाहून अण्णांचाही उत्साह वाढला. हिंदी चित्रपट अभिनेते अण्णांना भेटून पाठींबा देत होते. प्रसंगी फिल्मी डायलॉग मारून जमलेल्या लोकांमध्ये कमालीचा उत्साह वाढविण्यासाठी हातभार लावत होते. भेटायला आलेल्या व्हीआयपीना अल्पोहार किंवा ज्यूस देण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जात होता. या पवित्र उपक्रमासाठी कोणी ‘अर्थ’पूर्ण काम केले ते गुलदस्त्यात असले तरी लोकांना त्याचा त्याचवेळी सुगावा लागला होता.

आज काय परिस्थिती आहे? गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने लोकपालविषयी एकही अवाक्षर काढलं नाही. अण्णांनी उपोषणाचं बिगुल वाजवली आणि सात दिवस उपोषण करून लोकपालाची नियुक्ती सरकारकडून लिहून घेतली. स्वतःच्या अस्तित्त्वाची पेरणी आणि सरकारला झोपेतून हलविण्याची यशस्वी खेळी त्यांनी केली. या सर्व नाटकात लोकपालविषयक सरकारनेही आपला खुंटा मजबूत करून घेतला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भविष्यात लोकपालांची नियुक्ती होणार हा लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. ‘वाकडा तोंडांचा गांधी’ ही उपाधी देणाऱ्या शिवसेनेला अण्णांच्या मागे आम्ही असल्याचे लोकांसमोर दाखवून आमच्या विचारात बदल झाल्याचे दाखवता आले. अण्णांच्या जीवाशी खेळू नका असे सांगून त्यांच्या जीवाच्या रक्षणार्थ सेना ठाम उभी असल्याचे दाखवून दिले. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाचं लग्न आटोपून दुसऱ्या दिवशी राळेगणसिद्धीत हजर झाले. गावातील लोकांनी अण्णासाठी आंदोलन केले. अरविंद केजरीवाल किंवा किरण बेदी यांनी त्यांची साधी चौकशी केली नाही. परंतु महाराष्ट्रातील नेत्यांनी काळजी घेतल्याबद्दल अण्णा हजारे नक्कीच मनातून समाधानी झाले असतील. तस घडलं नसतं तर देशात तोंड दाखविण्यास जागा उरली नसती. सेवाभावी अण्णांची सेवा करून सर्व पक्षांनी कुंभमेळ्यात स्नान करावे त्याप्रमाणे अण्णांच्या अवतीभोवती राहून पुण्य पदरात पाडून घेतलं आणि पापक्षालनाचा, लोकशाहीच्या नावाने चांगभलं करण्याचा कार्यक्रम एकदाचा आटोपला. यादवबाबाही चिंतामुक्त झाले. राळेगणसिद्धी गावकरी त्यांच्या नेहमीच्या कामाला लागले.

छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत पण आमच्या घरात नको, त्याप्रमाणे अण्णा हजारे राहिले पाहिजेत, पण ते आमच्या विरोधात नको अशी लोकांची मानसिकता दिसून आली. अण्णा, तुम्ही पाहिजेत, पण राळेगणसिद्धीत राहा.. अशी मनोमन इच्छा व्यक्त केली असेल. लोकशाहीत या नवा तमाशा सुरू झाला आहे, तोही महाराष्ट्रातून. जे महाराष्ट्रात घडते त्याचे पडसाद इतर राज्यातही घडत असतात.. बघूया भविष्यात काय तो कायापालट होतोय..”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी केलेल्या २ जी, ३ जी, कोळसा खाणीचा लिलाव आदी भ्रष्टाचारांची प्रकरणे गाजत होती. लोकांमध्येही जबरदस्त सरकारविरोधी चीड होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये सहानुभूती होती. केंद्र सरकारमध्ये एवढा भ्रष्ट्राचार होत असताना डॉ. पंतप्रधान मनमोहन सिंह गप्प का? ते भ्रष्ट्राचारविरोधात कारवाई का करत नाहीत? अशी लोकांमध्ये त्यांच्याविषयी चीडही होती. परंतु भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे हात फार लांब असतात. लांब असणे म्हणजे त्यांचे हात राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेले असतात म्हणूनच कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराला राजकीय आसरा मिळत असल्याने सरकारविरोधी लोकांनी बेंबीच्या देठापासून ओरडून काहीही उपयोग नाही, हीच खरी लोकांची मानसिकता तयार झालेली असते. मात्र, त्यावेळी अण्णा नावाचा हजारातला एक माणूस पुढे आला. त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंम्मत तत्कालीन सरकारने दाखवली आणि ते लोकांचे खरे हिरो झाले.

“मै अण्णा हूँ” अशा टोप्या घालून लोक तत्कालीन सरकारवर प्रचंड नाराज झाले होते. त्यावेळी खूषमस्कऱ्यांचीही झुंबड अण्णाभोवती जमा लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अण्णांच्या उपोषणाच्या जागी कामाला लागले. ज्यांना निवडणुकीत काही उमेदवार निवडून आणावयाचे होते त्यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाचे फलित आहे. त्याशिवाय सनदी अधिकारी किरण बेदी अण्णांच्या मागे उभ्या होत्या. तेही तिरंगा झेंडा हातात घेऊन उजव्या-डाव्या बाजूला हलवून आम्ही भ्रष्टयाचाराचे खरे विरोधक अशाप्रकारे देशवासियांसमोर स्वतःची प्रतिमा तयार करत होत्या. त्यांना मोदी सरकारने राज्यपाल करून भ्रष्टाचारविरोधकांची म्हणजेच अण्णाच्या गोटातील उपद्रवी किरण बेदी यांना जाळ्यात ओढले.

 

काँग्रेस सरकारच्या कालावधीत लोकपाल नेमण्यासाठी अण्णांचा आग्रह मान्य करण्यात आला त्यानंतर अण्णांना पाठींबा देणारे भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदी सरकारला पाच वर्षे होत आली परंतु केंद्र सरकारने पाच वर्षांत लोकपाल नेमण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. वैशिष्टय म्हणजे अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला पाच वर्षांत ३५ वेळा पत्रे लिहून स्वतःची जबाबदारी पार पाडली आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत उपोषणाला न बसता राळेगणसिद्धी हे छोटेसे गाव निवडले. अण्णा हजारेंवर दिल्लीऐवजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याची वेळ का आली, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि राग होता. नेमके त्याचवेळी अण्णांचा उपोषणाचा निर्धार, यात अनेकांना राजकीय भविष्य घडविण्याचा संधी दिसू लागली. काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचायची ही संधी ओळखून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपोषण कार्यक्रमाला हातभार लावायला सुरूवात केली आणि संधीचं सोनं करायचा इरादा पक्का केला. रामलीला मैदानावर लोकांची गर्दी पाहून अण्णांचाही उत्साह वाढला. हिंदी चित्रपट अभिनेते अण्णांना भेटून पाठींबा देत होते. प्रसंगी फिल्मी डायलॉग मारून जमलेल्या लोकांमध्ये कमालीचा उत्साह वाढविण्यासाठी हातभार लावत होते. भेटायला आलेल्या व्हीआयपीना अल्पोहार किंवा ज्यूस देण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला जात होता. या पवित्र उपक्रमासाठी कोणी ‘अर्थ’पूर्ण काम केले ते गुलदस्त्यात असले तरी लोकांना त्याचा त्याचवेळी सुगावा लागला होता.

आज काय परिस्थिती आहे? गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने लोकपालविषयी एकही अवाक्षर काढलं नाही. अण्णांनी उपोषणाचं बिगुल वाजवली आणि सात दिवस उपोषण करून लोकपालाची नियुक्ती सरकारकडून लिहून घेतली. स्वतःच्या अस्तित्त्वाची पेरणी आणि सरकारला झोपेतून हलविण्याची यशस्वी खेळी त्यांनी केली. या सर्व नाटकात लोकपालविषयक सरकारनेही आपला खुंटा मजबूत करून घेतला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भविष्यात लोकपालांची नियुक्ती होणार हा लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. ‘वाकडा तोंडांचा गांधी’ ही उपाधी देणाऱ्या शिवसेनेला अण्णांच्या मागे आम्ही असल्याचे लोकांसमोर दाखवून आमच्या विचारात बदल झाल्याचे दाखवता आले. अण्णांच्या जीवाशी खेळू नका असे सांगून त्यांच्या जीवाच्या रक्षणार्थ सेना ठाम उभी असल्याचे दाखवून दिले. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाचं लग्न आटोपून दुसऱ्या दिवशी राळेगणसिद्धीत हजर झाले. गावातील लोकांनी अण्णासाठी आंदोलन केले. अरविंद केजरीवाल किंवा किरण बेदी यांनी त्यांची साधी चौकशी केली नाही. परंतु महाराष्ट्रातील नेत्यांनी काळजी घेतल्याबद्दल अण्णा हजारे नक्कीच मनातून समाधानी झाले असतील. तस घडलं नसतं तर देशात तोंड दाखविण्यास जागा उरली नसती. सेवाभावी अण्णांची सेवा करून सर्व पक्षांनी कुंभमेळ्यात स्नान करावे त्याप्रमाणे अण्णांच्या अवतीभोवती राहून पुण्य पदरात पाडून घेतलं आणि पापक्षालनाचा, लोकशाहीच्या नावाने चांगभलं करण्याचा कार्यक्रम एकदाचा आटोपला. यादवबाबाही चिंतामुक्त झाले. राळेगणसिद्धी गावकरी त्यांच्या नेहमीच्या कामाला लागले.

छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत पण आमच्या घरात नको, त्याप्रमाणे अण्णा हजारे राहिले पाहिजेत, पण ते आमच्या विरोधात नको अशी लोकांची मानसिकता दिसून आली. अण्णा, तुम्ही पाहिजेत, पण राळेगणसिद्धीत राहा.. अशी मनोमन इच्छा व्यक्त केली असेल. लोकशाहीत या नवा तमाशा सुरू झाला आहे, तोही महाराष्ट्रातून. जे महाराष्ट्रात घडते त्याचे पडसाद इतर राज्यातही घडत असतात.. बघूया भविष्यात काय तो कायापालट होतोय..”
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content