HomeArchiveशिवसेनेला पट(क)वले!

शिवसेनेला पट(क)वले!

Details
शिवसेनेला पट(क)वले!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
सुटलेला बाण आणि सुटलेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात. पण शिवसेना आणि भाजपाने सोमवारी ते करून दाखवले. परस्परांवर केलेल्या जहाल, तिखट टीकेचे बाण दोन्ही पक्षांनी लिलया परत घेतले, भात्यात बंद केले आणि गळ्यात गळेही घातले. जे काही २०१४ पासून बोलले गेले होते ते कडू जहर अपशब्दांचे, शेलक्या विशेषणांचे मानभंग करणारे घोटही गिळले. शब्द मागे घेतले, सारे काही जाजमाखाली सारले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो वृत्तवाहिन्यांच्या कॅमऱ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राला, देशाला तोंड भरून हसूनही दाखवले. ‘भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.. उगाच हसतो उगाच रूसतो.. कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे..’ या गाण्याचे शब्द या घडामोडींसाठी अगदी चपखल ठरावेत.

याच गाण्यात आणखी काही शब्द आहेत. कधी आतूर, कधी कातर.., पण ते लिहिले तर आतूर, कातूर हे सत्तेसाठी सत्तातूर झालेले, असे कुणी चिंतातूर क्षुद्र जंतू म्हणू शकतात. वास्तविक हा निर्णय तळागाळातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी घेतला गेला आहे. केवळ सत्ता-पदे यापेक्षाही सर्वसामान्यांच्या हिताचा व्यापक विचार करून शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र आले आहेत हा जो काही उदात्त आणि प्रबोधनपर विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे तो विरोधी पक्षांनीही समजून घेण्याची गरज आहे. ते सोडून विरोधी पक्ष म्हणतात की, शिवसेनेला इडीची भीती दाखवून भाजपाने पटवले आहे. सत्ता मिळणार नाही यामुळे चिडलेल्या विरोधी पक्षांचे हे चिमखडे बोल आहेत. जी भाजपा आणि अमित शाह शिवसेनेला पटकवण्याची भाषा बोलत होते त्यांना शिवसेनेला अशी भीती दाखवून पटवण्याची गरजच काय? दोन्ही पक्षांनी जनतेच्या भल्याचा विचार केला, ही उदात्त भूमिका विरोधी पक्षांच्या पचनी कधी पडणार हा खरा प्रश्न आहे.

 

जनतेच्या भल्यासाठी या दोन्ही पक्षांच्या धीरोदात्त नेत्यांनी काय काय म्हणून जाजमाखाली सारले आहे, विसरण्याचा प्रयत्न केला आहे याची उदाहरणे कितीतरी आहेत. अफझलखानाची स्वारी, पहारेकरीच चोर आहे, गाजरांची शेती आणि अशा कितीतरी शब्दांचे आसूड कडाडले होते. पण भाजपाने मोठ्या मनाने ते दुर्लक्षिले आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना अलिंगन दिले हे अवघ्या देशाने पाहिले. सारे मतभेद आता संपले आहेत, नाणार, राम मंदिर, देशाची सुरक्षा या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आहोत, असे अमित शाह यांनीच सांगितले.

देशासाठी इतका त्याग भाजपाने केला. देशासाठी सैनिकांनी आहुती दिली असताना भाजपानेही रागलोभांची आहुती दिली. फडणवीस यांनी मातोश्रीवर धाव घेऊन शिवसेनेलाही ‘समजावलं’. अर्थात देशहिताच्या व्यापक दृष्टिकोनातून. उद्धव यांना हा व्यापक दृष्टीकोन पटला असावा त्याशिवाय युती झालीच नसती. हा देश, राज्य मजबूत करण्यासाठी आम्ही या वळणावर एकत्र आलो आहोत. तमाम हिंदू या क्षणाची वाट पाहात होता, असे जाज्ज्वल्य शब्द यामुळेच त्यांनी अभिमानाने उच्चारले. वळण, नवीन सुरुवात, पुढचं पाऊल या त्यांच्या प्रत्येक शब्दांत अर्थ ठासून भरला आहे. ५० वर्षे ज्यांच्याशी संघर्ष करत आलो त्याच लोकांच्या हाती सत्ता द्यावी का? हा त्यांचा प्रश्न तत्त्व अधोरेखित करणारा आहे. ज्यांना हे समजलेले नाही ते आधी शिवसेना असं बोलत होती, तसं फुत्कारत होती आणि आता कशी युती झाली, वगैरे प्रश्न विचारत राहतील. पण भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवतील, असे निदान या घटकेचे वर्तमान आहे. त्यांचे जागावाटपाचे सूत्र तर ठरले आहे. लोकसभेसाठी भाजपाला शिवसेनेची राज्यात साथ अत्यावश्यक वाटत होती. यामुळेच शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढून भाजपाने युती पदरात पाडून घेतली आहे. विधानसभेसाठी मात्र २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकते. तेव्हा कदाचित पुन्हा शिवसेनेला अपेक्षित जागावाटप वाट्याला आले नाही तर अफझल खान, कुंभकर्ण, चोर, थापाड्या अशा बाणांची आठवण होऊ शकते. देशात भाजपाविरोधात विरोधी पक्ष आघाडी उभे करत असताना आणि जनमतही बदलल्याची झलक विधानसभा निवडणुकांतून मिळाल्यावर भाजपाने राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर व्यापक विचार करून शिवसेनेला चुचकारणे सद्यस्थितीत उचित मानले असावे. शिवसेनेलाही ते हवे होते याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बदललेल्या वक्तव्यांनी दिली होतीच. या युतीमुळे कोटी कोटी कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाली आहे, असे उद्धव आणि अमित शाह आता म्हणत असले तरी या दोघांनी परस्परांच्या मागण्यांची पूर्तता कशी केली त्याचा रहस्यभेद लोकांसाठी अधिक रंजक आणि सुरस असेल हे नक्की!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
सुटलेला बाण आणि सुटलेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात. पण शिवसेना आणि भाजपाने सोमवारी ते करून दाखवले. परस्परांवर केलेल्या जहाल, तिखट टीकेचे बाण दोन्ही पक्षांनी लिलया परत घेतले, भात्यात बंद केले आणि गळ्यात गळेही घातले. जे काही २०१४ पासून बोलले गेले होते ते कडू जहर अपशब्दांचे, शेलक्या विशेषणांचे मानभंग करणारे घोटही गिळले. शब्द मागे घेतले, सारे काही जाजमाखाली सारले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो वृत्तवाहिन्यांच्या कॅमऱ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राला, देशाला तोंड भरून हसूनही दाखवले. ‘भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर.. उगाच हसतो उगाच रूसतो.. कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहिली गोड करूनिया घेतो सारे..’ या गाण्याचे शब्द या घडामोडींसाठी अगदी चपखल ठरावेत.

याच गाण्यात आणखी काही शब्द आहेत. कधी आतूर, कधी कातर.., पण ते लिहिले तर आतूर, कातूर हे सत्तेसाठी सत्तातूर झालेले, असे कुणी चिंतातूर क्षुद्र जंतू म्हणू शकतात. वास्तविक हा निर्णय तळागाळातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी घेतला गेला आहे. केवळ सत्ता-पदे यापेक्षाही सर्वसामान्यांच्या हिताचा व्यापक विचार करून शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र आले आहेत हा जो काही उदात्त आणि प्रबोधनपर विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे तो विरोधी पक्षांनीही समजून घेण्याची गरज आहे. ते सोडून विरोधी पक्ष म्हणतात की, शिवसेनेला इडीची भीती दाखवून भाजपाने पटवले आहे. सत्ता मिळणार नाही यामुळे चिडलेल्या विरोधी पक्षांचे हे चिमखडे बोल आहेत. जी भाजपा आणि अमित शाह शिवसेनेला पटकवण्याची भाषा बोलत होते त्यांना शिवसेनेला अशी भीती दाखवून पटवण्याची गरजच काय? दोन्ही पक्षांनी जनतेच्या भल्याचा विचार केला, ही उदात्त भूमिका विरोधी पक्षांच्या पचनी कधी पडणार हा खरा प्रश्न आहे.

 

जनतेच्या भल्यासाठी या दोन्ही पक्षांच्या धीरोदात्त नेत्यांनी काय काय म्हणून जाजमाखाली सारले आहे, विसरण्याचा प्रयत्न केला आहे याची उदाहरणे कितीतरी आहेत. अफझलखानाची स्वारी, पहारेकरीच चोर आहे, गाजरांची शेती आणि अशा कितीतरी शब्दांचे आसूड कडाडले होते. पण भाजपाने मोठ्या मनाने ते दुर्लक्षिले आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना अलिंगन दिले हे अवघ्या देशाने पाहिले. सारे मतभेद आता संपले आहेत, नाणार, राम मंदिर, देशाची सुरक्षा या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आहोत, असे अमित शाह यांनीच सांगितले.

देशासाठी इतका त्याग भाजपाने केला. देशासाठी सैनिकांनी आहुती दिली असताना भाजपानेही रागलोभांची आहुती दिली. फडणवीस यांनी मातोश्रीवर धाव घेऊन शिवसेनेलाही ‘समजावलं’. अर्थात देशहिताच्या व्यापक दृष्टिकोनातून. उद्धव यांना हा व्यापक दृष्टीकोन पटला असावा त्याशिवाय युती झालीच नसती. हा देश, राज्य मजबूत करण्यासाठी आम्ही या वळणावर एकत्र आलो आहोत. तमाम हिंदू या क्षणाची वाट पाहात होता, असे जाज्ज्वल्य शब्द यामुळेच त्यांनी अभिमानाने उच्चारले. वळण, नवीन सुरुवात, पुढचं पाऊल या त्यांच्या प्रत्येक शब्दांत अर्थ ठासून भरला आहे. ५० वर्षे ज्यांच्याशी संघर्ष करत आलो त्याच लोकांच्या हाती सत्ता द्यावी का? हा त्यांचा प्रश्न तत्त्व अधोरेखित करणारा आहे. ज्यांना हे समजलेले नाही ते आधी शिवसेना असं बोलत होती, तसं फुत्कारत होती आणि आता कशी युती झाली, वगैरे प्रश्न विचारत राहतील. पण भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवतील, असे निदान या घटकेचे वर्तमान आहे. त्यांचे जागावाटपाचे सूत्र तर ठरले आहे. लोकसभेसाठी भाजपाला शिवसेनेची राज्यात साथ अत्यावश्यक वाटत होती. यामुळेच शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढून भाजपाने युती पदरात पाडून घेतली आहे. विधानसभेसाठी मात्र २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकते. तेव्हा कदाचित पुन्हा शिवसेनेला अपेक्षित जागावाटप वाट्याला आले नाही तर अफझल खान, कुंभकर्ण, चोर, थापाड्या अशा बाणांची आठवण होऊ शकते. देशात भाजपाविरोधात विरोधी पक्ष आघाडी उभे करत असताना आणि जनमतही बदलल्याची झलक विधानसभा निवडणुकांतून मिळाल्यावर भाजपाने राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर व्यापक विचार करून शिवसेनेला चुचकारणे सद्यस्थितीत उचित मानले असावे. शिवसेनेलाही ते हवे होते याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बदललेल्या वक्तव्यांनी दिली होतीच. या युतीमुळे कोटी कोटी कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाली आहे, असे उद्धव आणि अमित शाह आता म्हणत असले तरी या दोघांनी परस्परांच्या मागण्यांची पूर्तता कशी केली त्याचा रहस्यभेद लोकांसाठी अधिक रंजक आणि सुरस असेल हे नक्की!”
 

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content