HomeArchiveनववर्ष उत्साहात साजरे...

नववर्ष उत्साहात साजरे करा!

Details
नववर्ष उत्साहात साजरे करा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
गुढीपाडवा म्हणजे नववर्षारंभ. समस्त जनांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची सुरूवात जेथून करावी तो सण. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गुढ्या, पताका, ध्वज उभारण्यापासून ते मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल यादिवशी ठेवली जाते. अनेकजण यादिवशी सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी शुभदिवस म्हणून करत असतात. गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. गुढीपाडव्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी श्री राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून श्री रामाचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या सहाय्याने शकांचा प्रभाव केला आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरूवात करण्यात आली.

 

चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. आणि याच चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. यादिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्त्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठीही चांगली असतात.

चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरू होतो. कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी ही पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. ह्या दिवशी हाती घेतलेले काम यशस्वी होते असे मानले जाते. अर्थात नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरूवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. झाडांची पाने शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे, वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. त्यामुळे वतावरणदेखील प्रफुल्लित असते.
अशाप्रकारे या गुढीपाडव्याचे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व नैसर्गिक महत्त्व खूप मोठे आहे.

 

पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने पुरते व्यापून गेलेलो आम्ही इंग्रजी राजवटीतून अद्याप मुक्त झालेलो नाही असेच चित्र सध्या आहे. कॅलेंडर वर्षाचे पान पलटताना आजही आपण केवळ इंग्रजी महिनाच पाहतो. यावरून आपली इंग्रजाळलेली प्रखर भक्ती दिसून येते. 31 डिसेंबर या इंग्रजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला उत्साह, मादक व मनमुरादपणे आनंद लुटणारे आपल्यातले बरेच जण गुढीपाडव्याच्या दिवसास मात्र अनभिज्ञ व नामानिराळे असतात ही वस्तुस्थिती आहे. 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करणारे रात्री 12 नंतर नवे वर्ष सुरू होते असे मानतात. त्या दिवशी दारू, नाच गाणी, धिंगाणा करतात. रात्री १२ नंतर डिजेचा कर्णकर्कश नाद, दारू पिणारे नाचणारे आणि भांडणे करणारे तरूण यांच्या सहवासात वर्षाचा प्रारंभ आपल्याला योग्य वाटतो का? ते पाहून ‘खरेच हा नववर्षारंभ आहे’, असे आपल्याला वाटते का? याबाबत जरा विचारमंथन करा.

आपल्या दिवसाचा प्रारंभ दुःखाने झालेला आपल्याला आवडेल का? हिंदू संस्कृतीनुसार रात्री १२ वाजल्यानंतरचा काळ हा असुरांचा मानला जातो. मग अशा वातावरणात वर्षारंभ होऊ शकत नाही. आपण ज्याप्रकारे दिवसाचा प्रारंभ करतो, त्याप्रमाणे दिवसभरातील प्रत्येक कृतीवर त्याचा परिणाम होतो. दिवसाचा आरंभ जर आदर्श असेल तर दिवसातील प्रत्येक कृती आदर्श होते. याचप्रमाणे वर्षारंभ जर आदर्श भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला केला तर त्या व्यक्तीचे जीवन आदर्श बनेल. गुढीपाडवा ही शास्त्रानुसार व इतिहास असलेली तिथी आहे, उलट 1 जानेवारी हे शास्त्रहीन व इतिहासवजा नववर्ष आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला नव्या वर्षाची खऱ्या अर्थाने सुरूवात करून वाईट प्रवृत्ती, चालीरीती, प्रथा यांना तिलांजली देऊ या व हे हिंदू नववर्ष उत्साहात साजरे करू या!”
 
“वैभव मोहन पाटील
[email protected]
गुढीपाडवा म्हणजे नववर्षारंभ. समस्त जनांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची सुरूवात जेथून करावी तो सण. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गुढ्या, पताका, ध्वज उभारण्यापासून ते मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल यादिवशी ठेवली जाते. अनेकजण यादिवशी सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी शुभदिवस म्हणून करत असतात. गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. गुढीपाडव्याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी श्री राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून श्री रामाचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या सहाय्याने शकांचा प्रभाव केला आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरूवात करण्यात आली.

 

चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. आणि याच चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. यादिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्त्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठीही चांगली असतात.

चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरू होतो. कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी ही पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. ह्या दिवशी हाती घेतलेले काम यशस्वी होते असे मानले जाते. अर्थात नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरूवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. झाडांची पाने शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे, वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. त्यामुळे वतावरणदेखील प्रफुल्लित असते.
अशाप्रकारे या गुढीपाडव्याचे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व नैसर्गिक महत्त्व खूप मोठे आहे.

 

पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने पुरते व्यापून गेलेलो आम्ही इंग्रजी राजवटीतून अद्याप मुक्त झालेलो नाही असेच चित्र सध्या आहे. कॅलेंडर वर्षाचे पान पलटताना आजही आपण केवळ इंग्रजी महिनाच पाहतो. यावरून आपली इंग्रजाळलेली प्रखर भक्ती दिसून येते. 31 डिसेंबर या इंग्रजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला उत्साह, मादक व मनमुरादपणे आनंद लुटणारे आपल्यातले बरेच जण गुढीपाडव्याच्या दिवसास मात्र अनभिज्ञ व नामानिराळे असतात ही वस्तुस्थिती आहे. 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करणारे रात्री 12 नंतर नवे वर्ष सुरू होते असे मानतात. त्या दिवशी दारू, नाच गाणी, धिंगाणा करतात. रात्री १२ नंतर डिजेचा कर्णकर्कश नाद, दारू पिणारे नाचणारे आणि भांडणे करणारे तरूण यांच्या सहवासात वर्षाचा प्रारंभ आपल्याला योग्य वाटतो का? ते पाहून ‘खरेच हा नववर्षारंभ आहे’, असे आपल्याला वाटते का? याबाबत जरा विचारमंथन करा.

आपल्या दिवसाचा प्रारंभ दुःखाने झालेला आपल्याला आवडेल का? हिंदू संस्कृतीनुसार रात्री १२ वाजल्यानंतरचा काळ हा असुरांचा मानला जातो. मग अशा वातावरणात वर्षारंभ होऊ शकत नाही. आपण ज्याप्रकारे दिवसाचा प्रारंभ करतो, त्याप्रमाणे दिवसभरातील प्रत्येक कृतीवर त्याचा परिणाम होतो. दिवसाचा आरंभ जर आदर्श असेल तर दिवसातील प्रत्येक कृती आदर्श होते. याचप्रमाणे वर्षारंभ जर आदर्श भारतीय संस्कृतीप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला केला तर त्या व्यक्तीचे जीवन आदर्श बनेल. गुढीपाडवा ही शास्त्रानुसार व इतिहास असलेली तिथी आहे, उलट 1 जानेवारी हे शास्त्रहीन व इतिहासवजा नववर्ष आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला नव्या वर्षाची खऱ्या अर्थाने सुरूवात करून वाईट प्रवृत्ती, चालीरीती, प्रथा यांना तिलांजली देऊ या व हे हिंदू नववर्ष उत्साहात साजरे करू या!”
 
 

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content