HomeArchiveराहुल यांचे कडवे...

राहुल यांचे कडवे बोल!

Details
राहुल यांचे कडवे बोल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा राजीनामा फेटाळण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना पक्षाचे नेतृत्त्व करत राहण्याची विनंती केली. तथापि, राहुल यांनी राजीनामा मागे न घेण्याची आपली भूमिका कायम ठेवली. यासंदर्भात त्यांनी काही कडवे बोल काँग्रेसजनांना सुनावले. काँग्रसने या विषयावर आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या मुलांची उमेदवारी लादली याकडे राहुजींनी लक्ष वेधले. कोण होती ही नेत्यांची मुले? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत, भाजपचे भूतपूर्व केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे चिरंजीव मानवेद्र सिंह आणि भूतपूर्व केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांच्या कन्या सुष्मिता देव. या पुढार्यां च्या मुलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने घराणेशाहीला बढावा दिल्याची राहुल यांची तक्रार आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेसने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या हिंदीभाषिक प्रदेशात सत्ता खेचून आणली. पण या सत्तेचा लाभ ते लोकसभा निवडणुकीत उठवू शकले नाहीत. सत्ता येताच काँग्रेसमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या. पाच महिन्यांतच काँग्रेसजनांनी या राज्यांत आपले वाटोळे करून घेतले. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी युती करून काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. पण दक्षिणेकडील या हक्काच्या राज्यातदेखील काँग्रेस भुईसपाट झाली. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली 2017 साली काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. तेथे मात्र काँग्रेसने 13 पैकी 8 जागा जिंकून घवघवीत यश मिळविले. या सार्याप पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. पण 52 सदस्य असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीने तो राजीनामा फेटाळला आहे. राहुल यांनीच अध्यक्षपदी राहवे अशी गळ कमिटीने घातली आहे. अर्थात राहुल यांची पुढील भूमिका काय राहिल हे लवकरच कळेल. पण काँग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह आहे.

 

प्रियांका गांधी यांच्या नावाची कोणीतरी शिफारस करताच ‘माझ्या बहिणीला यात ओढू नका’, असे ठणकावून सांगत राहुल यांनी घराणेशाहीला बाणेदारपणे विरोध केला आहे. राहुल यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या या ठाम भूमिकेवरून दिसून येतो. आतापर्यंत काँग्रेस ही गांधी-नेहरू घराण्याभोवती फिरत आली आहे. अर्थात, लोकशाही मार्गानेच हे घराणे सतत सत्तेवर आले आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही हे 21 व्या शतकातदेखील स्पष्ट झाले होते. मृतवत झालेल्या काँग्रेसला सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाने संजीवनी दिली. त्यांनी दोन लोकसभा निवडणुका जिंकून काँग्रेसला उर्जितावस्थेत आणली. पण काँग्रेसमधील स्वार्थी पुढार्यांवनी सतत आपापल्या पोराबाळांना पुढे रेटून काँग्रेसची दैना केली. राहुल गांधी यांनी यासंदर्भात परखडपणे भूमिका मांडून घराणेशाही लादणार्या काँग्रेसजनांचे कान उपटले आहेत. राहुल यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा राजीनामा फेटाळण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना पक्षाचे नेतृत्त्व करत राहण्याची विनंती केली. तथापि, राहुल यांनी राजीनामा मागे न घेण्याची आपली भूमिका कायम ठेवली. यासंदर्भात त्यांनी काही कडवे बोल काँग्रेसजनांना सुनावले. काँग्रसने या विषयावर आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या मुलांची उमेदवारी लादली याकडे राहुजींनी लक्ष वेधले. कोण होती ही नेत्यांची मुले? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत, भाजपचे भूतपूर्व केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे चिरंजीव मानवेद्र सिंह आणि भूतपूर्व केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांच्या कन्या सुष्मिता देव. या पुढार्यां च्या मुलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने घराणेशाहीला बढावा दिल्याची राहुल यांची तक्रार आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेसने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या हिंदीभाषिक प्रदेशात सत्ता खेचून आणली. पण या सत्तेचा लाभ ते लोकसभा निवडणुकीत उठवू शकले नाहीत. सत्ता येताच काँग्रेसमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या. पाच महिन्यांतच काँग्रेसजनांनी या राज्यांत आपले वाटोळे करून घेतले. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी युती करून काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. पण दक्षिणेकडील या हक्काच्या राज्यातदेखील काँग्रेस भुईसपाट झाली. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली 2017 साली काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. तेथे मात्र काँग्रेसने 13 पैकी 8 जागा जिंकून घवघवीत यश मिळविले. या सार्याप पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. पण 52 सदस्य असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीने तो राजीनामा फेटाळला आहे. राहुल यांनीच अध्यक्षपदी राहवे अशी गळ कमिटीने घातली आहे. अर्थात राहुल यांची पुढील भूमिका काय राहिल हे लवकरच कळेल. पण काँग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह आहे.

 

प्रियांका गांधी यांच्या नावाची कोणीतरी शिफारस करताच ‘माझ्या बहिणीला यात ओढू नका’, असे ठणकावून सांगत राहुल यांनी घराणेशाहीला बाणेदारपणे विरोध केला आहे. राहुल यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या या ठाम भूमिकेवरून दिसून येतो. आतापर्यंत काँग्रेस ही गांधी-नेहरू घराण्याभोवती फिरत आली आहे. अर्थात, लोकशाही मार्गानेच हे घराणे सतत सत्तेवर आले आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही हे 21 व्या शतकातदेखील स्पष्ट झाले होते. मृतवत झालेल्या काँग्रेसला सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाने संजीवनी दिली. त्यांनी दोन लोकसभा निवडणुका जिंकून काँग्रेसला उर्जितावस्थेत आणली. पण काँग्रेसमधील स्वार्थी पुढार्यांवनी सतत आपापल्या पोराबाळांना पुढे रेटून काँग्रेसची दैना केली. राहुल गांधी यांनी यासंदर्भात परखडपणे भूमिका मांडून घराणेशाही लादणार्या काँग्रेसजनांचे कान उपटले आहेत. राहुल यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content