HomeArchiveमुंबईत लवकरच अधिकृत...

मुंबईत लवकरच अधिकृत नाईट लाईफ!

Details

 

 
 
 
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण ही दोन्ही खाती आली असल्याने मुंबईत नाईट लाईफची त्यांची कल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. पर्यटन खात्यामध्ये राज्याला आर्थिक सुबत्तेकडे नेण्याची क्षमता असल्याची स्वतः युवराज आणि चौथ्या पिढीचे ठाकरे यांची धारणा असल्याने मध्यरात्रीनंतरची मुंबईदेखील यात योगदान देऊ शकणार आहे.
 
 
“आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांची तसंच व्हिडिओग्राफीची स्पर्धा जाहीर केली आहे. त्याआधी मंत्री होण्यापूर्वी आमदार झाल्याझाल्या त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन नाईट लाईफ, या त्यांच्या कल्पनेतल्या उपक्रमाची चर्चेच्या पातळीवर सुरूवात करत निवडक मॉल्समध्ये मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत खाद्यपदार्थ देण्यासंदर्भात चर्चा केली आहे.”
 
 
“पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर एक रिव्ह्यू वा आढावा बैठक घेऊन त्यांनी खात्यात काय काय करता येईल, याची माहिती नुकतीच घेतली आहे. त्याबरोबरच प्रादेशिक पातळीवर पर्यटन आराखडे बनवून या क्षेत्रातून पर्यटक आणि गुंतवणूक कशी येईल, याचाही ते विचार करणार आहेत. मुंबईत बुधवारी झालेल्या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाईट लाईफच्या त्यांच्या संकल्पनेबद्दल फार काही सांगितले नाही. पण लवकरच करू, अशा शब्दात त्यांनी मध्यरात्रीनंतरची मुंबई आता अधिकृतरीत्या जागी राहील, याचे सूतोवाच केले आहे.”

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content