HomeArchiveपोखरणमध्ये होतेय वायूशक्ती...

पोखरणमध्ये होतेय वायूशक्ती २०१९!

Details
पोखरणमध्ये होतेय वायूशक्ती २०१९!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगभरातून येणार दर्शक

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशाच्या वायू सेनेची ताकद गेल्या वर्षी ‘ऑपरेशन गगन भरारी’ने दाखवून दिल्यावर आता पुन्हा भारतीय वायू सेना येत्या शनिवारी आपल्या ताकदीचा परिचय करून देणार आहे. एक मोठा यद्धसराव सादर केला जाणार असून त्यात विविध प्रकारची १३० विमानं, हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत. जगभरातून अनेक पाहुणे येथे येणार असल्याने त्यांच्यासमोर हे कौशल्य दिसेल.

वायूशक्ती सरावात दिवसा, संध्याकाळी, रात्री युद्ध करण्याची वायू सेनेची ‘शक्ती’ सर्वांना समजेल. उपलब्ध माहितीनुसार सायंकाळी पाचनंतर सुरू होणाऱ्या या चित्तथरारक कवायती दोन तास चालू राहतील. यात वायुसेनेची सुखोई-३०, मिग-२९, मिराज-२०००, जग्वार, मिग-२७, अशी आघाडीची लढाऊ विमानं सहभाग घेतील. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची तेजस-ऍडव्हान्स लाईट, हेलिकॉप्टर रुद्र आपला दमखम दाखवतील.

 

स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आकाश आणि हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ‘अस्त्र’ हे या अभ्यासाचं आणखी एक आकर्षण आहे. सरावात सामील होणारी विमानं ही लगतच्या जैसलमेर, फलौदी, नाल, अंबाला, उत्तरलाई, आग्रा, जोधपूर या एअरबेसवरुन सामील होणार आहेत. दर तीन वर्षांनी भारतीय वायू सेना आपल्या युद्धहल्ल्याची क्षमता तपासत असते. यापूर्वी १९५४ पर्यंत दिल्ली जवळच्या तीलपत रेंजमध्ये ही प्रात्यक्षिके व्हायची. पण आता ती पोखरण येथे होतात.

दरम्यान, गेल्या बारा दिवसात दुसरे लढाऊ विमान अपघाती शिकार होऊन भंगारात गेल्याने वायू दलावर चिंतेचं सावट पसरले आहे. कारण, पुढील आठवड्यात बेंगळुरूजवळच्या येळहांका या एचएएलच्या विस्तीर्ण मैदानावर एरो स्पेस हा दर दोन वर्षांनी होणारा जागतिक शो सुरू होतोय. ऐन चार दिवस आधी मंगळवारी संध्याकाळी पोखरण रेंजवर, जैसलमेरच्या खेतोतोलाई फिल्डमध्ये मिग-२७ च्या कोसळण्याने डोकेदुखी वाढलीय. सोवियत संघ काळातील हे विमान १९८० साली खरेदी झाले होते. कारगिल युद्धात डोंगरावर लपून बसलेल्या शत्रू सैन्यावर हल्ला चढवून पाकड्या घुसखोर सैन्याचा बंदोबस्त करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. पायलट सुरक्षित असून चौकशीचे आदेश वायुदलाने दिले आहेत. फ्लॅईंग कॉफीन म्हणून कुख्यात झालेल्या या विमानाची उड्डाणे २०१०पासून थांबवण्यात आली होती. या विमान अपघातांची मालिका २००१पासून सुरू होऊन १२ अपघातग्रस्त झाली. यानंतर या तुकडीला उड्डाण थांबवण्याचे आदेश दिले गेले.

गेल्या बारा दिवसात दुसरे विमान जे अपघातग्रस्त झाले जे प्रशिक्षणासाठी गेले होते. एक फेब्रुवारी रोजी एचएएलच्या येळहांका तळावर झालेल्या अपघातात दोन पायलट ठार झाले होते. एक तर विमानाच्या ढिगाऱ्यातच पॅराशूट असूनही पडला नि स्वर्गवासी झाला. मात्र, नेमक्या कारणांचा शोध लागला नसला तरी काहींच्या मते देखभाल तर काहींच्या मते पुरेशा तंत्रकौशल्याचा अभाव सांगितले जाते. घटनेची चौकशी चालू आहे.

शनिवारी होणाऱ्या वायूशक्तीच्या अभ्यासात एकूण १३७ नाना प्रकारची विमानं भाग घेतील. मिग२९-७, जग्वार-१७, सु-३०-२४, मिग-२७ सुधारित-११, मिग-२१ बिसेन-४, मिराज २०००-४, हॉक-८, तेजस-६, AN-३२-४, C 130-५, AEW&C-१, mi 17 v5 -१५, ALH MK IV-७, Mi35-३, RPA 4 अशांचा समावेश आहे.”
 
“जगभरातून येणार दर्शक

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशाच्या वायू सेनेची ताकद गेल्या वर्षी ‘ऑपरेशन गगन भरारी’ने दाखवून दिल्यावर आता पुन्हा भारतीय वायू सेना येत्या शनिवारी आपल्या ताकदीचा परिचय करून देणार आहे. एक मोठा यद्धसराव सादर केला जाणार असून त्यात विविध प्रकारची १३० विमानं, हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत. जगभरातून अनेक पाहुणे येथे येणार असल्याने त्यांच्यासमोर हे कौशल्य दिसेल.

वायूशक्ती सरावात दिवसा, संध्याकाळी, रात्री युद्ध करण्याची वायू सेनेची ‘शक्ती’ सर्वांना समजेल. उपलब्ध माहितीनुसार सायंकाळी पाचनंतर सुरू होणाऱ्या या चित्तथरारक कवायती दोन तास चालू राहतील. यात वायुसेनेची सुखोई-३०, मिग-२९, मिराज-२०००, जग्वार, मिग-२७, अशी आघाडीची लढाऊ विमानं सहभाग घेतील. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची तेजस-ऍडव्हान्स लाईट, हेलिकॉप्टर रुद्र आपला दमखम दाखवतील.

 

स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आकाश आणि हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ‘अस्त्र’ हे या अभ्यासाचं आणखी एक आकर्षण आहे. सरावात सामील होणारी विमानं ही लगतच्या जैसलमेर, फलौदी, नाल, अंबाला, उत्तरलाई, आग्रा, जोधपूर या एअरबेसवरुन सामील होणार आहेत. दर तीन वर्षांनी भारतीय वायू सेना आपल्या युद्धहल्ल्याची क्षमता तपासत असते. यापूर्वी १९५४ पर्यंत दिल्ली जवळच्या तीलपत रेंजमध्ये ही प्रात्यक्षिके व्हायची. पण आता ती पोखरण येथे होतात.

दरम्यान, गेल्या बारा दिवसात दुसरे लढाऊ विमान अपघाती शिकार होऊन भंगारात गेल्याने वायू दलावर चिंतेचं सावट पसरले आहे. कारण, पुढील आठवड्यात बेंगळुरूजवळच्या येळहांका या एचएएलच्या विस्तीर्ण मैदानावर एरो स्पेस हा दर दोन वर्षांनी होणारा जागतिक शो सुरू होतोय. ऐन चार दिवस आधी मंगळवारी संध्याकाळी पोखरण रेंजवर, जैसलमेरच्या खेतोतोलाई फिल्डमध्ये मिग-२७ च्या कोसळण्याने डोकेदुखी वाढलीय. सोवियत संघ काळातील हे विमान १९८० साली खरेदी झाले होते. कारगिल युद्धात डोंगरावर लपून बसलेल्या शत्रू सैन्यावर हल्ला चढवून पाकड्या घुसखोर सैन्याचा बंदोबस्त करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. पायलट सुरक्षित असून चौकशीचे आदेश वायुदलाने दिले आहेत. फ्लॅईंग कॉफीन म्हणून कुख्यात झालेल्या या विमानाची उड्डाणे २०१०पासून थांबवण्यात आली होती. या विमान अपघातांची मालिका २००१पासून सुरू होऊन १२ अपघातग्रस्त झाली. यानंतर या तुकडीला उड्डाण थांबवण्याचे आदेश दिले गेले.

गेल्या बारा दिवसात दुसरे विमान जे अपघातग्रस्त झाले जे प्रशिक्षणासाठी गेले होते. एक फेब्रुवारी रोजी एचएएलच्या येळहांका तळावर झालेल्या अपघातात दोन पायलट ठार झाले होते. एक तर विमानाच्या ढिगाऱ्यातच पॅराशूट असूनही पडला नि स्वर्गवासी झाला. मात्र, नेमक्या कारणांचा शोध लागला नसला तरी काहींच्या मते देखभाल तर काहींच्या मते पुरेशा तंत्रकौशल्याचा अभाव सांगितले जाते. घटनेची चौकशी चालू आहे.

शनिवारी होणाऱ्या वायूशक्तीच्या अभ्यासात एकूण १३७ नाना प्रकारची विमानं भाग घेतील. मिग२९-७, जग्वार-१७, सु-३०-२४, मिग-२७ सुधारित-११, मिग-२१ बिसेन-४, मिराज २०००-४, हॉक-८, तेजस-६, AN-३२-४, C 130-५, AEW&C-१, mi 17 v5 -१५, ALH MK IV-७, Mi35-३, RPA 4 अशांचा समावेश आहे.”
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content