Homeचिट चॅट५वी अजित घोष...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून


मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८ संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असून मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ती होत आहे. त्याकरीता माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावरील माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद क्लबची मैदाने मुंबई क्रिकेट संघटनेने उपलब्ध करुन दिली आहेत.

स्पर्धेमधील ८ संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यंदा “एसजी”चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेंडू उपलब्ध झाल्याने गोलंदाजांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळत आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव नदीम मेमन यांनी हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेमध्ये “एसजी”चे चेंडू उपलब्ध करुन दिल्यानंतर स्थानिक स्पर्धा आणि विशेषत: ज्युनियर खेळाडूंना याचा आवश्य लाभ होईल. याशिवाय नदीम मेमन यांनी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूंना पारितोषिके देऊ केल्याने स्पर्धेतील खेळाडूंना अधिकचे काही उत्तेजनार्थ मिळणार आहे. स्पर्धेतील उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना “एसजी”चे क्रिकेट किट भेट देण्यात येईल. प्राथमिक साखळीतून गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताच्या माजी खेळाडू अरुंधती घोष यांच्या या उपक्रमाला हंसाबेन मेहता, रेड फॉक्सचे आशिष रेडिज्, क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे, संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांचे सहकार्य लाभले आहे.

अ गट: महाराष्ट्र यंग, स्पोर्टिंग युनियन, बोरीवली क्रिकेट क्लब, साईनाथ स्पोर्ट्स.

ब गट: जे भटिया सी. सी., भामा सी. सी., डॅशिंग स्पोर्ट्स, एस.आर.जी.स्पोर्ट्स ऑफिशियल.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content