Homeचिट चॅट५वी अजित घोष...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून


मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८ संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असून मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ती होत आहे. त्याकरीता माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावरील माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद क्लबची मैदाने मुंबई क्रिकेट संघटनेने उपलब्ध करुन दिली आहेत.

स्पर्धेमधील ८ संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यंदा “एसजी”चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेंडू उपलब्ध झाल्याने गोलंदाजांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळत आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव नदीम मेमन यांनी हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेमध्ये “एसजी”चे चेंडू उपलब्ध करुन दिल्यानंतर स्थानिक स्पर्धा आणि विशेषत: ज्युनियर खेळाडूंना याचा आवश्य लाभ होईल. याशिवाय नदीम मेमन यांनी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूंना पारितोषिके देऊ केल्याने स्पर्धेतील खेळाडूंना अधिकचे काही उत्तेजनार्थ मिळणार आहे. स्पर्धेतील उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना “एसजी”चे क्रिकेट किट भेट देण्यात येईल. प्राथमिक साखळीतून गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताच्या माजी खेळाडू अरुंधती घोष यांच्या या उपक्रमाला हंसाबेन मेहता, रेड फॉक्सचे आशिष रेडिज्, क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे, संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांचे सहकार्य लाभले आहे.

अ गट: महाराष्ट्र यंग, स्पोर्टिंग युनियन, बोरीवली क्रिकेट क्लब, साईनाथ स्पोर्ट्स.

ब गट: जे भटिया सी. सी., भामा सी. सी., डॅशिंग स्पोर्ट्स, एस.आर.जी.स्पोर्ट्स ऑफिशियल.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content