Homeचिट चॅट५वी अजित घोष...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून


मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८ संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असून मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ती होत आहे. त्याकरीता माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावरील माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद क्लबची मैदाने मुंबई क्रिकेट संघटनेने उपलब्ध करुन दिली आहेत.

स्पर्धेमधील ८ संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला किमान तीन सामने खेळण्याची संधी प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यंदा “एसजी”चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चेंडू उपलब्ध झाल्याने गोलंदाजांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळत आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव नदीम मेमन यांनी हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेमध्ये “एसजी”चे चेंडू उपलब्ध करुन दिल्यानंतर स्थानिक स्पर्धा आणि विशेषत: ज्युनियर खेळाडूंना याचा आवश्य लाभ होईल. याशिवाय नदीम मेमन यांनी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूंना पारितोषिके देऊ केल्याने स्पर्धेतील खेळाडूंना अधिकचे काही उत्तेजनार्थ मिळणार आहे. स्पर्धेतील उत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना “एसजी”चे क्रिकेट किट भेट देण्यात येईल. प्राथमिक साखळीतून गटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताच्या माजी खेळाडू अरुंधती घोष यांच्या या उपक्रमाला हंसाबेन मेहता, रेड फॉक्सचे आशिष रेडिज्, क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे, संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांचे सहकार्य लाभले आहे.

अ गट: महाराष्ट्र यंग, स्पोर्टिंग युनियन, बोरीवली क्रिकेट क्लब, साईनाथ स्पोर्ट्स.

ब गट: जे भटिया सी. सी., भामा सी. सी., डॅशिंग स्पोर्ट्स, एस.आर.जी.स्पोर्ट्स ऑफिशियल.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content