HomeArchiveहाजी अलीला उड्डाणपूल...

हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

Details
हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content