HomeArchiveसमता परिषदेचे रक्तदान...

समता परिषदेचे रक्तदान शिबिर संपन्न!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबईतल्या गोरेगाव दिंडोशी संतोष नगर येथील हनुमान मंदीर सभा मंडपात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 
“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बाधित रुग्णांना मदतीचा हात देताना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुंबई उपाध्यक्ष सोपान शेळके, चिटणीस रघुनाथ कोट्टारी, डॉ. चंद्रमोहन होळबे व तालुका अध्यक्ष विलास घुले यांचा मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ”
  

 
“राष्टवादी काँग्रेसचे उत्तर पच्छिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यानी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी एकूण 91 जणांनी रक्तदान केले तर त्यातील 13 जण काही कारणास्तव बाद झाले 61 रक्ताच्या पिशव्या (बाटल्या) जमा झाल्या व प्लाज्मा थेरेपी नोंदणीकरिता 17 जणांनी नावे नोंदवली, असे कोटटारी यानी सांगितले. संपूर्ण मुंबईत आजवर याच काळात 24 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केली होती व सुमारे 700 हून अधिक पिशव्या (बाटल्या) रक्त जमा केले, असेही ते म्हणाले.”
 
“शिबिरास शिवसेना नगरसेवक तुळशीराम शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश चाळके, महिला अध्यक्षा राधिमी मोरे तसेच काँग्रेसचे पधाधिकारी राकेश यादव व मारूती उगले उपस्थित होते.”

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content