HomeArchiveसमता परिषदेचे रक्तदान...

समता परिषदेचे रक्तदान शिबिर संपन्न!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबईतल्या गोरेगाव दिंडोशी संतोष नगर येथील हनुमान मंदीर सभा मंडपात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 
“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बाधित रुग्णांना मदतीचा हात देताना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुंबई उपाध्यक्ष सोपान शेळके, चिटणीस रघुनाथ कोट्टारी, डॉ. चंद्रमोहन होळबे व तालुका अध्यक्ष विलास घुले यांचा मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ”
  

 
“राष्टवादी काँग्रेसचे उत्तर पच्छिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यानी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी एकूण 91 जणांनी रक्तदान केले तर त्यातील 13 जण काही कारणास्तव बाद झाले 61 रक्ताच्या पिशव्या (बाटल्या) जमा झाल्या व प्लाज्मा थेरेपी नोंदणीकरिता 17 जणांनी नावे नोंदवली, असे कोटटारी यानी सांगितले. संपूर्ण मुंबईत आजवर याच काळात 24 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केली होती व सुमारे 700 हून अधिक पिशव्या (बाटल्या) रक्त जमा केले, असेही ते म्हणाले.”
 
“शिबिरास शिवसेना नगरसेवक तुळशीराम शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश चाळके, महिला अध्यक्षा राधिमी मोरे तसेच काँग्रेसचे पधाधिकारी राकेश यादव व मारूती उगले उपस्थित होते.”

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content