HomeArchiveशहीद करकरेंची साध्वीकडून...

शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

Details
शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

 

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

 

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content