HomeArchiveशहीद करकरेंची साध्वीकडून...

शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

Details
शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

 

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

 

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content