HomeArchiveशहीद करकरेंची साध्वीकडून...

शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

Details
शहीद करकरेंची साध्वीकडून `हत्त्या’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

 

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरेरे! हे काय घडले? देशासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांची तथाकथित साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिने पुन्हा `हत्त्या’ केली. 26/11 चे संकट कोण विसरेल? अतिरेकी कसाब आणि त्याच्या नराधम साथीदारांनी त्यादिवशी मुंबईवर हल्ला चढविला. निष्पाप, निरागस आणि असहाय्य लोकांची त्यांनी क्रूरपणे हत्त्या केली. समुद्र मार्गाने येऊन त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावरच हल्ला चढविला. अतिरेक्यांनी क्रूरकृत्याचा कळस गाठला. त्यांना पकडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावलेले हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे हे देशासाठी शहीद झाले. अवघा देश त्यांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला. पण अतिरेकी म्हणून जिच्यावर खटला सुरू आहे, ती प्रज्ञा सिंह ठाकूर मात्र त्यांचे हे बलिदान विसरली. आजारपणाच्या कारणास्तव जामीन मिळविणारी प्रज्ञा आपला थयथयाट व्यक्त करताना म्हणाली की, `करकरे माझ्या शापाने मेले. एका साध्वीचा शाप त्यांना भोवला. त्यांनी मला अटक केल्यानंतर मी त्यांना शाप दिला होता. त्यानंतर ते सुतकात होते. माझ्या शापानंतर अवघ्या सव्वा महिन्यात करकरे गेले. तेव्हा त्यांच्यावरील सुतक संपुष्टात आले.’

 

वास्तविक प्रज्ञा ही संशयित अतिरेकी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक झाली होती. एटीएसचे त्यावेळचे प्रमुख हेमंत करकरे या बॉम्बस्फोटाची चौकशी करीत होते. ते आपले कर्तव्य पार पाडत होते. पण अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला, स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या प्रज्ञाने शाप दिला. ही कसली साध्वी? यासंदर्भात एक किस्सा आठवला. चंद्रशेखर पंतप्रधान असताना गिरगाव चौपाटीवर जैन संतांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी एका जैन साध्वीने आपल्या जहाल भाषणात राजकीय पुढाऱ्यांवर जोरदार टीका केली. लोकांनी टाळ्यांचा गजर करीत तिला दाद दिली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणातून तिला जे उत्तर दिले ते अप्रतिम होते. त्या जनसागराने चंद्रशेखर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरश: उचलून घेतले. चंद्रशेखर म्हणाले, `आम्ही राजकारणी वाईट आहोत, हे मला मान्य आहे. पण आमच्यावर टीका करून तुम्ही का वाईट होता? आमचे वाईटपण आमच्याकडेच राहू द्या. शेवटी टीका आणि निंदादेखील हिंसाचार असतो. तो हिंसाचार साध्वीने आणि संतांनी करू नये.’ मोजक्या शब्दात चंद्रशेखर यांनी त्या वाचाळ साध्वीला तिची जागा दाखविली. आज प्रज्ञा ठाकूरदेखील अशीच शाब्दिक हिंसा करीत आहे. तिला तिची जागा कोण दाखविणार?

बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात प्रज्ञा गुंतलेली आहे. पण तरीही भाजपने तिला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे शक्तीशाली नेते आहेत. पण त्यांना रोखण्यासाठी संशयित अतिरेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे कितपत योग्य आहे? आता प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयिक्तक मत असल्याचा खुलासा भाजपकडून केला जाईल. करकरे यांच्याविषयी पक्षाला आदर असल्याचेदेखील सांगितले जाईल. पण असा आदर केवळ कागदोपत्री दिसता कामा नये. तो कृतीतून दिसायला हवा. भाजपने प्रज्ञा ठाकूर हिची उमेदवारी ताबडतोब रद्द करून तिचे विमान जमिनीवर आणायला हवे. तसे न केल्यास भाजपलादेखील आगामी निवडणुकीत भारी किंमत मोजावी लागेल. शहीदांचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही.”
 

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content