HomeArchiveविधानसभेत डावलल्यास स्वतंत्र...

विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी

Details
विधानसभेत डावलल्यास स्वतंत्र मुंबईच्या मागणीचा उठाव – डॉ. भानजी

    19-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.
 
कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.
 
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
 
 
याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“कोळी समाजाला स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत कुठल्याही पक्षाने एकही उमेदवारी दिलेली नाही. भाजपा-शिवसेना युती सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मुंबई, पालघर, तसेच रायगडच्या विधानसभेवर कोळी समाजाला उमेदवारी द्यावी. अन्यथा समाज पेटून उठून जन आंदोलनाद्वारे स्वतंत्र मुंबईची मागणी करू, असा इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेनचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी नुकताच दिला.”

 
“कोळी समाज आणि ज्ञातीय समाजाला मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांना भाजपा-सेना युतीने विधानसभेत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी डॉ. भानजी यांनी वेसावे बंदरावर झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. मुंबई (बॉम्बे प्रेसिडेन्सी) हे पूर्वीपासून स्वतंत्र राज्य होते आणि त्याचे मूळ भूमिपुत्र कोळी, आगरी, भंडारी, ख्रिश्चन आहेत. सयुंक्त महाराष्ट्र चळ्वळीनंतर महाराष्ट्रात १९६० मध्ये विलीन झाले. खरेतर या मूळ निवासी समाजाला राजकीय न्याय देणे गरजेचे होते. परंतु परप्रांतीयांपेक्षा स्वकीयांनीच या समाजाचा घात केलाय, असे दिसून येते अशी टीका विजय वरळीकर व नंदकुमार शिवडीकर यांनी केली.”

 
२०१४ च्या विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोळी समाजाने एकही तिकीट मागितले नव्हते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देता की जाता’चा नारा दिला आणि काँग्रेस आघाडी सरकार पायउतार झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास लोक प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन देऊन आशेचे किरण दाखविले होते. मात्र अजूनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने मुंबईतील भूमिपुत्रांना खंत आहे असे डॉ. भानजी म्हणाले.
 
 
“याप्रसंगी विजय वरळीकर, विकास मोतीराम कोळी, नंदकुमार शिवडीकर, जयेंद्र भानजी, सुमन कोळी, रेखा पागधरे, छाया भानजी, पंकज बने, प्रतिभा वैती, स्वप्नील कोळी, केसरीनाथ तरे, अब्दुल रशीद सोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.”

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content