HomeArchiveरिक्षात उर्मिला मातोंडकर!

रिक्षात उर्मिला मातोंडकर!

Details
रिक्षात उर्मिला मातोंडकर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
(रंगीलाफेम उर्मिला मातोंडकर आमच्या बंड्याला भेटली, तीही रिक्षात.. विश्वास बसत नाही ना? पण सत्य आहे. तिला ‘चंदेरी’ पडद्यावर पाहत होता तो आणि उगाच तो मनातल्या मनात तिच्याविषयी ‘चित्र’पट रंगवत असे तरूणपणी. उर्मिला आपल्याला कधी भेटेल का? आपण तिच्याशी बोलू का? अशाप्रकारे मनात काहीतरी विचार तरूण असताना येत होते. बोरीवलीला मित्राकडे चालला होता तो, रिक्षातून.. त्याच्या रिक्षात साक्षात उर्मिला मातोंडकर बसली.. दोघांत भरउन्हात ‘गार’ संवाद झाला..)

उर्मिला: नमस्कार भाऊ.. (भाऊ म्हणताच बंड्या चांगलाच घामाघूम झाला.. तिच्याविषयी ऐन तारूण्यात काय काय स्वप्न रंगवली, ती रंगीला बंड्याला चक्क भाऊ म्हणाली.. मनातल्या मनात तो रागावला. पण, उर्मिलासाठी त्याने तो राग हळुवार गिळला..)
बंड्या: उर्मिला मातोंडकर, तू आणि रिक्षात. कमाल आहे. तू निवडणुकीला उभी आहेस, पण माझ्या रिक्षात माझ्याबरोबर बसशील असं स्वप्नातही वाटलं नाही. आणि हे बघ तू सर्वांची लाडकी आहेस, तू मला भाऊ हाक मारू नकोस.. महाराष्ट्रात एकच भाऊ आहे तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’मधला भाऊ कदम.. समजलं?
उर्मिला: हे बघ, नाव काय तुझं? (असं म्हणताच बंड्याला अंगावर मोरपीस फिरविल्यासारखे वाटले.. रिक्षात असूनही मर्सिडीजमध्ये असल्यासारखे वाटले..)
बंड्या: माझं नाव बंड्या..
उर्मिला: शीssss इश्शsss तू मराठी आहेस ना? तुला संपूर्ण नाव घ्यायला लाज वाटते का? मी बघ, माझं नाव उर्मिला असून मी चित्रपटात उर्मिला मातोंडकर असेच लावले.. सुरूवातीला ते हिंदीभाषिक मातोंडकरऐवजी मारतोडकर बोलायचे.. त्यांना मातोंडकर बोलायची सक्ती केली की नाही मी!
बंड्या: माझं नाव बंड्या मारोतकर.. (बंड्याने कसेबसे तिच्याशी जुळेल असे आडनाव सांगितले)

 
उर्मिला: अरे व्वाsss आपल्या नावातही किती साम्य आहे ना? बरं, सांग मी लोकसभेसाठी उभी आहे याचा तुला अभिमान वाटत असेल.. हो की नाही? (लाडात, लाडात येऊन उर्मिलेने बंड्याला बोलण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला)
बंड्या: हो मला तुझा अभिमान वाटतो.. (एव्हढ्यात स्पीडब्रेकर आल्याने ती बंड्याच्याजवळ येते.. आणि बंड्याला काहीच सुचेना.. तो एका वेगळ्या विश्वात रमतो..)
उर्मिला: बंड्या तू बोलत नाहीस, तुला काय झालं? (बिस्लरीची बाटली त्याच्या तोंडाजवळ धरत) हे घे पाणी..
बंड्या: थँक्स..
उर्मिला: तू लोकसभेत मला पाठवणार ना?
बंड्या: हो तुलाच देणार माझं मत.. त्या गोपाळ शेट्टीची बघ कशी शिट्टी वाजवतो? दक्षिणेतून आला, झोपडपट्टीत राहिला आणि शिक्षण किती तर फक्त सातवी. आम्ही डबल ग्रॅज्युएट होऊन अजून रिक्षातूनच प्रवास करतोय..
उर्मिला: हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, बंड्या.. हे बघ मला सांग तुझ्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या आहेत?
बंड्या: आमच्या समस्या काय सांगू तुला.. (बंड्याचा घसा कोरडा झाल्याने उर्मिलाने पुन्हा त्याच्यासमोर पाण्याची बाटली धरली.. बंड्याने बोलण्याच्या नादात बाटली तोंडाला लावली)
उर्मिला: असू दे, असू दे..
बंड्या: बघ, तू पाणी दिलंस आणि पाण्याची आठवण झाली.. आमच्या सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी पाणी येते आणि त्याला काही फोर्स नसतो..
उर्मिला: आलं लक्षात.. तुमच्याकडे पाणी कमी येतं..
बंड्या: आणि हे रस्त्यावरील खड्डे, यामुळे संध्याकाळी घरी गेल्यावर पाठ दुखते.. हे रस्ते चांगले करण्यासाठी तू लक्ष दे..
उर्मिला: आणखी महत्त्वाचा कोणता प्रोब्लेम?
बंड्या: उर्मिला, तू कधी ट्रेनने प्रवास केलास का?
उर्मिला: हो, गोरेगाव ते दादर असा प्रवास करत कॉलेजला जात होती.. रेल्वे डब्यातून बाहेर पडताना कित्येकवेळा स्टेशनवर पुस्तके पडायची माझी..
बंड्या: तुझी पुस्तके पडायची, अगं गर्दीमुळे आम्हाला स्टेशनवर उतरता येत नाही..
उर्मिला: फार वाईटच परिस्थिती.. मी निवडून आल्यावर रेल्वेमंत्र्याकडे हा प्रश्न धसास लावीन..
आणखी कोणती समस्या?
बंड्या: हो तुला सांगायला विसरलो. त्या अदानीने वीज कंपनी हातात घेतल्यापासून आम्हा ग्राहकांना तो दर महिन्याला शॉक देतोय.. (हे ऐकून उर्मिलेने बंड्याच्या खांद्यावर हात ठेवला.. बंड्याला शरीरात वीजप्रवाह गेल्याचा भास झाला..) आणि हो.. भाज्या महाग होत चालल्या आहेत. रोज बायकोचं नाही, नाही ते ऐकावं लागतं..
उर्मिला: काय तुमच्या समस्या रे बंड्या.. अक्षरशः हा वनवास आहे..
बंड्या: वनवास नाही तर काय? आता सेना-भाजपवाले राममंदिर उभारणार आहेत..
उर्मिला: तुझी काही हरकत आहे का?
बंड्या: हरकत नाही, पण राममंदिर उभारून हेच सेना-भाजपवाले आम्हाला शहाणपणा शिकवतील..
उर्मिला: ते कसं काय?
बंड्या: राम हा आपल्या सर्वांचा आदर्श आहे.. महात्मा गांधींना ‘रामराज्य’ आणायचं होते ते स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे भाजप म्हणेल..
उर्मिला: बोलू दे त्यांना.. नुसतं बोलणं हेच भाजपचे काम आहे..
बंड्या: अगं, उर्मिले तुला कसं कळत नाही? (बंड्या बायकोला बोलतो त्या थाटात बोलतो तसा उर्मिलावर खेकसतो..) हे भाजपवाले भाषणात बोलतील, महागाईचा हा वनवास भोगताना श्रीराम प्रभूचा आदर्श सर्वांनी ठेवावा. रामाने जो १४ वर्षे वनवास भोगला तोच आदर्श ठेवून आज महागाई, रेल्वे प्रवास, खड्ड्यातून प्रवासाचा वनवास भोगू या..
(उर्मिलेने बंड्याच्या हातातील पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावली.. बंड्या तिच्या तोंडाकडे बघत राहिला.. सामान्य माणसाशी एकरूप होणारी उर्मिला त्याला प्रथमच दिसली.. त्याला रंगीला उर्मिला हा एक चित्रपटाचा भाग होता.. प्रत्यक्षातली उर्मिला ही आपली वाटत होती)
उर्मिला: बंड्या, चल मी उतरते.. मला बऱ्याच लोकांना भेटायचे आहे..
बंड्या: हे बघ उर्मिला, निवडून आल्यावर आम्हाला विसरू नकोस..
उर्मिला: नाही रे बंड्या.. (उर्मिलेने बंड्याच्या केसांवरून हात फिरवत रिक्षातून उतरली..)
बंड्या: (रिक्षावाल्याला सांगतो.. सिग्नलजवळ रिक्षा उभी कर..) किती झालेत?
रिक्षावाला: ५० रूपये.. साहेब तुम्ही खुश झाला असाल.. हो ना?
बंड्या: एवढी मोठी अभिनेत्री, रिक्षात बसते काय? ओळख असल्यासारखी बोलते काय? सर्व कसं अनपेक्षितच!
रिक्षावाला: (५० रूपये घेऊन..) बंड्याभाऊ, ती उर्मिला मातोंडकर नव्हती तर तिची डमी होती.. (असं म्हणत तो तिथून सटकला..)”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
(रंगीलाफेम उर्मिला मातोंडकर आमच्या बंड्याला भेटली, तीही रिक्षात.. विश्वास बसत नाही ना? पण सत्य आहे. तिला ‘चंदेरी’ पडद्यावर पाहत होता तो आणि उगाच तो मनातल्या मनात तिच्याविषयी ‘चित्र’पट रंगवत असे तरूणपणी. उर्मिला आपल्याला कधी भेटेल का? आपण तिच्याशी बोलू का? अशाप्रकारे मनात काहीतरी विचार तरूण असताना येत होते. बोरीवलीला मित्राकडे चालला होता तो, रिक्षातून.. त्याच्या रिक्षात साक्षात उर्मिला मातोंडकर बसली.. दोघांत भरउन्हात ‘गार’ संवाद झाला..)

उर्मिला: नमस्कार भाऊ.. (भाऊ म्हणताच बंड्या चांगलाच घामाघूम झाला.. तिच्याविषयी ऐन तारूण्यात काय काय स्वप्न रंगवली, ती रंगीला बंड्याला चक्क भाऊ म्हणाली.. मनातल्या मनात तो रागावला. पण, उर्मिलासाठी त्याने तो राग हळुवार गिळला..)
बंड्या: उर्मिला मातोंडकर, तू आणि रिक्षात. कमाल आहे. तू निवडणुकीला उभी आहेस, पण माझ्या रिक्षात माझ्याबरोबर बसशील असं स्वप्नातही वाटलं नाही. आणि हे बघ तू सर्वांची लाडकी आहेस, तू मला भाऊ हाक मारू नकोस.. महाराष्ट्रात एकच भाऊ आहे तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’मधला भाऊ कदम.. समजलं?
उर्मिला: हे बघ, नाव काय तुझं? (असं म्हणताच बंड्याला अंगावर मोरपीस फिरविल्यासारखे वाटले.. रिक्षात असूनही मर्सिडीजमध्ये असल्यासारखे वाटले..)
बंड्या: माझं नाव बंड्या..
उर्मिला: शीssss इश्शsss तू मराठी आहेस ना? तुला संपूर्ण नाव घ्यायला लाज वाटते का? मी बघ, माझं नाव उर्मिला असून मी चित्रपटात उर्मिला मातोंडकर असेच लावले.. सुरूवातीला ते हिंदीभाषिक मातोंडकरऐवजी मारतोडकर बोलायचे.. त्यांना मातोंडकर बोलायची सक्ती केली की नाही मी!
बंड्या: माझं नाव बंड्या मारोतकर.. (बंड्याने कसेबसे तिच्याशी जुळेल असे आडनाव सांगितले)

 
उर्मिला: अरे व्वाsss आपल्या नावातही किती साम्य आहे ना? बरं, सांग मी लोकसभेसाठी उभी आहे याचा तुला अभिमान वाटत असेल.. हो की नाही? (लाडात, लाडात येऊन उर्मिलेने बंड्याला बोलण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला)
बंड्या: हो मला तुझा अभिमान वाटतो.. (एव्हढ्यात स्पीडब्रेकर आल्याने ती बंड्याच्याजवळ येते.. आणि बंड्याला काहीच सुचेना.. तो एका वेगळ्या विश्वात रमतो..)
उर्मिला: बंड्या तू बोलत नाहीस, तुला काय झालं? (बिस्लरीची बाटली त्याच्या तोंडाजवळ धरत) हे घे पाणी..
बंड्या: थँक्स..
उर्मिला: तू लोकसभेत मला पाठवणार ना?
बंड्या: हो तुलाच देणार माझं मत.. त्या गोपाळ शेट्टीची बघ कशी शिट्टी वाजवतो? दक्षिणेतून आला, झोपडपट्टीत राहिला आणि शिक्षण किती तर फक्त सातवी. आम्ही डबल ग्रॅज्युएट होऊन अजून रिक्षातूनच प्रवास करतोय..
उर्मिला: हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, बंड्या.. हे बघ मला सांग तुझ्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या आहेत?
बंड्या: आमच्या समस्या काय सांगू तुला.. (बंड्याचा घसा कोरडा झाल्याने उर्मिलाने पुन्हा त्याच्यासमोर पाण्याची बाटली धरली.. बंड्याने बोलण्याच्या नादात बाटली तोंडाला लावली)
उर्मिला: असू दे, असू दे..
बंड्या: बघ, तू पाणी दिलंस आणि पाण्याची आठवण झाली.. आमच्या सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी पाणी येते आणि त्याला काही फोर्स नसतो..
उर्मिला: आलं लक्षात.. तुमच्याकडे पाणी कमी येतं..
बंड्या: आणि हे रस्त्यावरील खड्डे, यामुळे संध्याकाळी घरी गेल्यावर पाठ दुखते.. हे रस्ते चांगले करण्यासाठी तू लक्ष दे..
उर्मिला: आणखी महत्त्वाचा कोणता प्रोब्लेम?
बंड्या: उर्मिला, तू कधी ट्रेनने प्रवास केलास का?
उर्मिला: हो, गोरेगाव ते दादर असा प्रवास करत कॉलेजला जात होती.. रेल्वे डब्यातून बाहेर पडताना कित्येकवेळा स्टेशनवर पुस्तके पडायची माझी..
बंड्या: तुझी पुस्तके पडायची, अगं गर्दीमुळे आम्हाला स्टेशनवर उतरता येत नाही..
उर्मिला: फार वाईटच परिस्थिती.. मी निवडून आल्यावर रेल्वेमंत्र्याकडे हा प्रश्न धसास लावीन..
आणखी कोणती समस्या?
बंड्या: हो तुला सांगायला विसरलो. त्या अदानीने वीज कंपनी हातात घेतल्यापासून आम्हा ग्राहकांना तो दर महिन्याला शॉक देतोय.. (हे ऐकून उर्मिलेने बंड्याच्या खांद्यावर हात ठेवला.. बंड्याला शरीरात वीजप्रवाह गेल्याचा भास झाला..) आणि हो.. भाज्या महाग होत चालल्या आहेत. रोज बायकोचं नाही, नाही ते ऐकावं लागतं..
उर्मिला: काय तुमच्या समस्या रे बंड्या.. अक्षरशः हा वनवास आहे..
बंड्या: वनवास नाही तर काय? आता सेना-भाजपवाले राममंदिर उभारणार आहेत..
उर्मिला: तुझी काही हरकत आहे का?
बंड्या: हरकत नाही, पण राममंदिर उभारून हेच सेना-भाजपवाले आम्हाला शहाणपणा शिकवतील..
उर्मिला: ते कसं काय?
बंड्या: राम हा आपल्या सर्वांचा आदर्श आहे.. महात्मा गांधींना ‘रामराज्य’ आणायचं होते ते स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे भाजप म्हणेल..
उर्मिला: बोलू दे त्यांना.. नुसतं बोलणं हेच भाजपचे काम आहे..
बंड्या: अगं, उर्मिले तुला कसं कळत नाही? (बंड्या बायकोला बोलतो त्या थाटात बोलतो तसा उर्मिलावर खेकसतो..) हे भाजपवाले भाषणात बोलतील, महागाईचा हा वनवास भोगताना श्रीराम प्रभूचा आदर्श सर्वांनी ठेवावा. रामाने जो १४ वर्षे वनवास भोगला तोच आदर्श ठेवून आज महागाई, रेल्वे प्रवास, खड्ड्यातून प्रवासाचा वनवास भोगू या..
(उर्मिलेने बंड्याच्या हातातील पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावली.. बंड्या तिच्या तोंडाकडे बघत राहिला.. सामान्य माणसाशी एकरूप होणारी उर्मिला त्याला प्रथमच दिसली.. त्याला रंगीला उर्मिला हा एक चित्रपटाचा भाग होता.. प्रत्यक्षातली उर्मिला ही आपली वाटत होती)
उर्मिला: बंड्या, चल मी उतरते.. मला बऱ्याच लोकांना भेटायचे आहे..
बंड्या: हे बघ उर्मिला, निवडून आल्यावर आम्हाला विसरू नकोस..
उर्मिला: नाही रे बंड्या.. (उर्मिलेने बंड्याच्या केसांवरून हात फिरवत रिक्षातून उतरली..)
बंड्या: (रिक्षावाल्याला सांगतो.. सिग्नलजवळ रिक्षा उभी कर..) किती झालेत?
रिक्षावाला: ५० रूपये.. साहेब तुम्ही खुश झाला असाल.. हो ना?
बंड्या: एवढी मोठी अभिनेत्री, रिक्षात बसते काय? ओळख असल्यासारखी बोलते काय? सर्व कसं अनपेक्षितच!
रिक्षावाला: (५० रूपये घेऊन..) बंड्याभाऊ, ती उर्मिला मातोंडकर नव्हती तर तिची डमी होती.. (असं म्हणत तो तिथून सटकला..)”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content