HomeArchiveरावेरची 'रक्षा' कोणाकडे?

रावेरची ‘रक्षा’ कोणाकडे?

Details
रावेरची ‘रक्षा’ कोणाकडे?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राज्याच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्रातील नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात कांटे की टक्कर होणार असून भाजप आपला गड कायम राखणार की रावेरकरांची रक्षा काँग्रेस उमेदवार करणार हे लवकरच समजेल. वर्षानुवर्षे भाजपच्या अधिपत्याखाली राहिलेल्या या मतदारसंघात फक्त दोन वेळाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तर महाराष्ट्र, विशेषतः खान्देशच्या राजकारणात गेली काही वर्षे माजी मंत्री आणि भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे यांचे प्राबल्य राहिले आहे. अनेक वर्षे ते आपला राजकीय दबदबा राखून होते. नाथाभाऊंना आडवे जाण्याची कुणाची हिंमत नव्हती. या भागात त्यांनी पक्ष रूजवायला मेहनत घेतली. नाथा बोले पक्ष हाले अशी एकवेळ परिस्थिती होती. पण राजकारणात कोणीच कधी सदासर्वदा पॉवरफुल राहत नाही आणि याच उक्तीप्रमाणे नाथा यांना पक्षांतर्गत आव्हान गिरीश महाजन यांच्या रूपाने उभे राहिले.

 

नाथाभाऊ मंत्री असताना काही प्रकरणांत त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला आणि मातब्बर नेते असूनही राजकीय विजनवास त्यांच्या खात्यावर लिहिला गेला. त्यांची राजकीय ओहोटी सुरू झाली. त्याचवेळी गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू झाली. महाजन पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले. हा झाला इतिहास. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. रक्षा या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा. परिणामी यावेळीसुद्धा रक्षा यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. भाजपांतर्गत गटबाजीचा फटका यावेळी रक्षा यांना बसू शकतो. कारण येथेही खडसे आणि महाजन यांना मानणारे दोन गट आहेत आणि त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण नेहमी पाहवयास मिळते. या निवडणुकीतसुद्धा महाजन गट किती प्रामाणिकपणे खडसे यांना मदत करतो हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. त्यातच भाजपने शिवसेनेसोबत युती केली असली तरी येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे आणि खडसे यांचे अजिबात पटत नाही. त्यांच्यातून विस्तवसुद्धा जात नाही. त्यामुळे शिवसेनेचेही पाठबळ खडसे यांना कितपत राहील यावरच विजयाचे गणित मांडले जाऊ शकते.

काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांची प्रतिमा आणि काँग्रेसांतर्गत सर्व गट एकत्र काम करत असल्याने तसेच राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्तेसुद्धा एकदिलाने काम करत असल्याने पाटील यांना विजयाची खात्री आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच आघाडीतील घटक पक्ष यांची ताकद पाटील यांच्यामागे उभी आहे. या मतदारसंघात लेवा समाजाची संख्या मोठी आहे आणि यावेळी हे दोन्ही उमेदवार लेवा समाजाचे असल्याने त्यांना इतर समाजाच्या मतावर अवलंबून राहवे लागेल. त्यातच नितीन काडेलकर हे वंचितचे उमेदवार कोणाची मते खातात यावरही विजयाची पताका कुणाची फडकते हे अवलंबून आहे. मतदारसंघात अद्यापही अनेक समस्या आहेत. सिंचनाचा प्रश्न कायम आहे, केळीवर आधारित उद्योग येथे अद्याप आले नाहीत, बेरोजगारीची समस्या आहेच. या प्रश्नांचाही परिणाम निवडणुकीत दिसणार आहे.”
 
“अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राज्याच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्रातील नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात कांटे की टक्कर होणार असून भाजप आपला गड कायम राखणार की रावेरकरांची रक्षा काँग्रेस उमेदवार करणार हे लवकरच समजेल. वर्षानुवर्षे भाजपच्या अधिपत्याखाली राहिलेल्या या मतदारसंघात फक्त दोन वेळाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तर महाराष्ट्र, विशेषतः खान्देशच्या राजकारणात गेली काही वर्षे माजी मंत्री आणि भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे यांचे प्राबल्य राहिले आहे. अनेक वर्षे ते आपला राजकीय दबदबा राखून होते. नाथाभाऊंना आडवे जाण्याची कुणाची हिंमत नव्हती. या भागात त्यांनी पक्ष रूजवायला मेहनत घेतली. नाथा बोले पक्ष हाले अशी एकवेळ परिस्थिती होती. पण राजकारणात कोणीच कधी सदासर्वदा पॉवरफुल राहत नाही आणि याच उक्तीप्रमाणे नाथा यांना पक्षांतर्गत आव्हान गिरीश महाजन यांच्या रूपाने उभे राहिले.

 

नाथाभाऊ मंत्री असताना काही प्रकरणांत त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला आणि मातब्बर नेते असूनही राजकीय विजनवास त्यांच्या खात्यावर लिहिला गेला. त्यांची राजकीय ओहोटी सुरू झाली. त्याचवेळी गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू झाली. महाजन पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले. हा झाला इतिहास. 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. रक्षा या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा. परिणामी यावेळीसुद्धा रक्षा यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. भाजपांतर्गत गटबाजीचा फटका यावेळी रक्षा यांना बसू शकतो. कारण येथेही खडसे आणि महाजन यांना मानणारे दोन गट आहेत आणि त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण नेहमी पाहवयास मिळते. या निवडणुकीतसुद्धा महाजन गट किती प्रामाणिकपणे खडसे यांना मदत करतो हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. त्यातच भाजपने शिवसेनेसोबत युती केली असली तरी येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे आणि खडसे यांचे अजिबात पटत नाही. त्यांच्यातून विस्तवसुद्धा जात नाही. त्यामुळे शिवसेनेचेही पाठबळ खडसे यांना कितपत राहील यावरच विजयाचे गणित मांडले जाऊ शकते.

काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांची प्रतिमा आणि काँग्रेसांतर्गत सर्व गट एकत्र काम करत असल्याने तसेच राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्तेसुद्धा एकदिलाने काम करत असल्याने पाटील यांना विजयाची खात्री आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच आघाडीतील घटक पक्ष यांची ताकद पाटील यांच्यामागे उभी आहे. या मतदारसंघात लेवा समाजाची संख्या मोठी आहे आणि यावेळी हे दोन्ही उमेदवार लेवा समाजाचे असल्याने त्यांना इतर समाजाच्या मतावर अवलंबून राहवे लागेल. त्यातच नितीन काडेलकर हे वंचितचे उमेदवार कोणाची मते खातात यावरही विजयाची पताका कुणाची फडकते हे अवलंबून आहे. मतदारसंघात अद्यापही अनेक समस्या आहेत. सिंचनाचा प्रश्न कायम आहे, केळीवर आधारित उद्योग येथे अद्याप आले नाहीत, बेरोजगारीची समस्या आहेच. या प्रश्नांचाही परिणाम निवडणुकीत दिसणार आहे.”
 

Continue reading

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य 'मेगा रोड शो'देखील...

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...
Skip to content