HomeArchiveराज की बात!

राज की बात!

Details
राज की बात!

    23-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com 
 
‘धर्मा’ या जुन्या चित्रपटात बिंदू प्राणला एका कव्वालीतून म्हणते, राज की बात कहदू तो जाने महफिल में क्या हो.., राज ठाकरे आणि त्यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, ही अशीच रंगलेली मैफल कम चौकशी. आपल्याकडे सर्वांना लागलेली वाईट सवय अशी की, व्यवहार मग ते कोणत्याही मालमत्तेचे असोत त्यात काळा व्यवहार झाला नाही असे कधीही घडत नाही. त्यामुळे कोहिनूरप्रकरणी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी झालेले व्यवहार त्यातून घडलेले गैरव्यवहार ईडीच्या हाती आले. आयते कोलीत त्यांना सापडले. त्यातून नको ते घडले, ज्या एकमेव विरोधकाच्या नुसत्या भाषणाने सत्ताधारी युतीला घाम फुटायचा, लोकसभा निवडणुकीदरम्यान घुमलेला हा राजआवाज ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थंडावला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारात लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गाजलेले एकमेव राज ठाकरे यावेळी ऐकायला मिळण्याची शक्यता अजूनही प्रश्नांकित आहे.
 

एकदा का अमुक एखाद्या व्यवहारात विशेषतः मालमत्तेच्या देवाणघेवाणीत काळा पैसा तमुक एखाद्या कुटुंबात आला की त्या काळ्या पैशांचे पांढरे झटपट करण्याची वाईट सवय भारतीयांना असते आणि तेथेच आम्ही अडकतो. ईडीच्या हाती ठाकरे कुटुंबाचे त्यांच्या कोहिनूर प्रकरणातील शिरोडकरसारख्या मित्रांचे नेमके याच पद्धतीचे पुरावे हाती आल्याने राज आणि मित्रपरिवाराला ही चौकशी कठीण जाईल, अशी माझी माहिती आहे. आज जे शिवसेना किंवा भाजपामध्ये दाखल झाले आहेत ते जवळपास सारेच या पद्धतीने मोठ्या प्रमाणात काळ्या व्यवहारात गुंतलेले. शासकीय अधिकारी किंवा सरकारी कंत्राटदार तसेच दलाल तर खूपच पुढे रांगेत आहेत. पण, सध्यातरी ते सेफ असल्याने सरकारच्या तिजोरीत त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर असलेला काळा पैसा जमा होईल असे दूरदूरपर्यंत दिसत नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले मोठे नीच आणि चतुर असतात.
 
 
या राज्यात थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने मराठी माणसाने बघावे ते राज ठाकरे एकतर मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर खूप वर्षांनी पूर्वीच्या जोशात, जोमात लोकसभा निवडणूक प्रचारात दिसले. नेमका त्यांचा आवाज लगेचच काही महिन्यांत दिसेनासा होणे, मनापासून वाईट वाटते. असे घडायला नको होते. राज यांच्यापुढे काळ्या व्यवहारात कितीतरी पुढे असलेले या राज्यातले अनेक, पण संकट केवळ राज यांच्यावर ओढवले तेही वाईट वाटले. पीएमएलए हा कायदाच काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना रोखणारा आहे. त्यात किमान तीन वर्षे जामीनदेखील मिळत नाही. त्यामुळेच या राज्यातले, या देशातले आजपर्यंत काळा पैसा पांढरा करणारे शासकीय, प्रशासकीय अधिकारी, नेते, शासकीय दलाल आणि कंत्राटदार धास्तावलेले आहेत. अर्थात कोणीतरी हा कायदा राबविण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले होते. ते मोदी सरकारने केले. आज त्या-त्या नेत्यांच्या फॉलोअर्सना वाईट वाटते. पण, हे घडणे अत्यावश्यक होते. एकदाचे घडायला लागले.
 
 

 
 
 
ईडी ही देशातील सर्वाधिक शक्तिशाली तपासयंत्रणा. त्यामुळे ईडीच्या कचाट्यात सापडणे म्हणजे जवळपास रस्त्यावर येणे असे आहे. ईडी तपासाची मोठी किंमत कशी मोजावी लागते ते भुजबळ कुटुंबाबाबतीत आपण यापूर्वी बघितले आहेच. प्रश्न एकच मनाला पडतो की, टप्प्याटप्प्याने नवश्रीमंत यात अडकतील की आश्रयाला गेले असल्याने सुटतील. ते एक गूढ आहे. मात्र, असे घडले आणि राज्यातले भामटे जर आश्रयाला गेल्याने सुटले तर विशेषतः भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. लोकांच्या मनातून ते उतरतील. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ईडीला अमुक एखाद्याला अटक करण्याचे थेट अधिकार आहेत. जेथे जामीन देण्यासाठी प्रसंगी न्यायालयेदेखील कचरतात. केवळ राज ठाकरे किंवा उन्मेष जोशी यांची ईडीने जरी चौकशी केलेली असली तरी आणखी काही मंडळींची त्यात पुढे चौकशी होणार असल्याची माझी माहिती आहे, ज्याची संबंधितांना कल्पना आलेली असल्याने अनेक चौकशीच्या धाकाने धास्तावलेले आहेत.”

 
 
हेमंत जोशी..
hemant.offtherecord@gmail.com 
 
“‘धर्मा’ या जुन्या चित्रपटात बिंदू प्राणला एका कव्वालीतून म्हणते, राज की बात कहदू तो जाने महफिल में क्या हो.., राज ठाकरे आणि त्यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, ही अशीच रंगलेली मैफल कम चौकशी. आपल्याकडे सर्वांना लागलेली वाईट सवय अशी की, व्यवहार मग ते कोणत्याही मालमत्तेचे असोत त्यात काळा व्यवहार झाला नाही असे कधीही घडत नाही. त्यामुळे कोहिनूरप्रकरणी तब्बल ९-१० वर्षांपूर्वी झालेले व्यवहार त्यातून घडलेले गैरव्यवहार ईडीच्या हाती आले. आयते कोलीत त्यांना सापडले. त्यातून नको ते घडले, ज्या एकमेव विरोधकाच्या नुसत्या भाषणाने सत्ताधारी युतीला घाम फुटायचा, लोकसभा निवडणुकीदरम्यान घुमलेला हा राजआवाज ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर थंडावला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रचारात लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गाजलेले एकमेव राज ठाकरे यावेळी ऐकायला मिळण्याची शक्यता अजूनही प्रश्नांकित आहे.”
 

“एकदा का अमुक एखाद्या व्यवहारात विशेषतः मालमत्तेच्या देवाणघेवाणीत काळा पैसा तमुक एखाद्या कुटुंबात आला की त्या काळ्या पैशांचे पांढरे झटपट करण्याची वाईट सवय भारतीयांना असते आणि तेथेच आम्ही अडकतो. ईडीच्या हाती ठाकरे कुटुंबाचे त्यांच्या कोहिनूर प्रकरणातील शिरोडकरसारख्या मित्रांचे नेमके याच पद्धतीचे पुरावे हाती आल्याने राज आणि मित्रपरिवाराला ही चौकशी कठीण जाईल, अशी माझी माहिती आहे. आज जे शिवसेना किंवा भाजपामध्ये दाखल झाले आहेत ते जवळपास सारेच या पद्धतीने मोठ्या प्रमाणात काळ्या व्यवहारात गुंतलेले. शासकीय अधिकारी किंवा सरकारी कंत्राटदार तसेच दलाल तर खूपच पुढे रांगेत आहेत. पण, सध्यातरी ते सेफ असल्याने सरकारच्या तिजोरीत त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर असलेला काळा पैसा जमा होईल असे दूरदूरपर्यंत दिसत नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले मोठे नीच आणि चतुर असतात.”
 
 
“या राज्यात थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने मराठी माणसाने बघावे ते राज ठाकरे एकतर मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर खूप वर्षांनी पूर्वीच्या जोशात, जोमात लोकसभा निवडणूक प्रचारात दिसले. नेमका त्यांचा आवाज लगेचच काही महिन्यांत दिसेनासा होणे, मनापासून वाईट वाटते. असे घडायला नको होते. राज यांच्यापुढे काळ्या व्यवहारात कितीतरी पुढे असलेले या राज्यातले अनेक, पण संकट केवळ राज यांच्यावर ओढवले तेही वाईट वाटले. पीएमएलए हा कायदाच काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना रोखणारा आहे. त्यात किमान तीन वर्षे जामीनदेखील मिळत नाही. त्यामुळेच या राज्यातले, या देशातले आजपर्यंत काळा पैसा पांढरा करणारे शासकीय, प्रशासकीय अधिकारी, नेते, शासकीय दलाल आणि कंत्राटदार धास्तावलेले आहेत. अर्थात कोणीतरी हा कायदा राबविण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले होते. ते मोदी सरकारने केले. आज त्या-त्या नेत्यांच्या फॉलोअर्सना वाईट वाटते. पण, हे घडणे अत्यावश्यक होते. एकदाचे घडायला लागले.”
 
 

 
 
 
“ईडी ही देशातील सर्वाधिक शक्तिशाली तपासयंत्रणा. त्यामुळे ईडीच्या कचाट्यात सापडणे म्हणजे जवळपास रस्त्यावर येणे असे आहे. ईडी तपासाची मोठी किंमत कशी मोजावी लागते ते भुजबळ कुटुंबाबाबतीत आपण यापूर्वी बघितले आहेच. प्रश्न एकच मनाला पडतो की, टप्प्याटप्प्याने नवश्रीमंत यात अडकतील की आश्रयाला गेले असल्याने सुटतील. ते एक गूढ आहे. मात्र, असे घडले आणि राज्यातले भामटे जर आश्रयाला गेल्याने सुटले तर विशेषतः भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. लोकांच्या मनातून ते उतरतील. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ईडीला अमुक एखाद्याला अटक करण्याचे थेट अधिकार आहेत. जेथे जामीन देण्यासाठी प्रसंगी न्यायालयेदेखील कचरतात. केवळ राज ठाकरे किंवा उन्मेष जोशी यांची ईडीने जरी चौकशी केलेली असली तरी आणखी काही मंडळींची त्यात पुढे चौकशी होणार असल्याची माझी माहिती आहे, ज्याची संबंधितांना कल्पना आलेली असल्याने अनेक चौकशीच्या धाकाने धास्तावलेले आहेत.”

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content