HomeArchiveराज्यात मोफत शिक्षण...

राज्यात मोफत शिक्षण आणि रोजगाराची संधी!

Details
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“शिका व कमवा योजनेंतर्गत राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमधील नामांकीत इंडस्ट्रीजमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट या संघटनेने अभिनव योजना सुरू केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासमवेत ही शासनमान्य योजना राबवली जात असून त्यामुळे दहावी, बारावी, आयटीआय आणि पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.”
 
“कौशल्य भारत (Skill India) मिशन अंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्य सरकारनेच अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने ‘शिका व कमवा’ ही शासनमान्य योजना राबवली आहे. संस्थेने राज्यातील जवळपास सर्वच जिल्हे आणि तालुक्यांमध्ये याची प्रवेश व मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहेत. १८ ते ३० वर्षे वयोगटातील विद्यार्थी तसेच बेरोजगार व्यक्तींना या संधीचा फायदा मिळणार आहे, असे अभिनव इन्स्टिट्यूटचे चेअरमन सुधीर दीक्षित यांनी सांगितले.”
 
“या माध्यमातून पदविका स्तरावरील अभ्यासक्रम शिकत असताना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगधंदे आणि व्यवसायामध्ये सामावून घेता येणार आहे. या कालावधीत त्यांना विद्यावेतनही मिळणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी येणारा खर्च उपभोक्ता म्हणून उद्योजकांकडून केला जाणार आहे. यापूर्वीच व्यावसायिक, रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये सामावून घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.”
 
“राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, बोईसर, पालघर, नाशिक या परिसरात अनेक नामांकित इंडस्ट्रिजमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. हा रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व बेरोजगार व्यक्तींनी पुढील ठिकाणी संपर्क साधावा.”
 
संपर्क क्रमांक: ७४००१४८१२२/७४००१४८३४०/०२२-४९६९०३२७.
 
ई-मेल : contact@abhinavinst.com
 
वेबसाईट: www.abhinavinst.com

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content