HomeArchiveराज्यस्तरीय पाढे पाठांतर...

राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा लवकरच!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मराठी भाषा व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटिंगद्वारे दि. ३ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे.”
 
मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने सहआयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे.
 
“पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनादतर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे. जिल्हा पातळी, विभाग पातळी व राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेण्यात येणार असली तरी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाढे पाठांतर स्पर्धा खुली आहे. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे. स्पर्धा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल, असे नामजोशी यांनी सांगितले.”
 
स्पर्धेचे नियोजन
 
जिल्हा पातळीवर: विद्यार्थी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडीओ क्लिप मेलवर पाठवतील. जिल्हास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांना त्या त्या गटातील इयत्ताचा अंकनाद सेट बक्षीस देण्यात येईल.
 
राज्य पातळीवर: विभागनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांचे पाढ्यांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर परीक्षण करण्यात येईल.
 
“प्रवेश, सहभाग आणि पारितोषिके”
 
जिल्हा पातळी: प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन
 
राज्य पातळी: प्रत्येक विभागातील पहिल्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यातून प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन. सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक बक्षीस व मानचिन्ह देण्यात येईल.
 
ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यासाठी दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरून आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करता येतील.
 
जिल्हा पातळीवर विद्यार्थ्याचा दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडीओ अपलोड करावा लागेल.
 
“बालगट (वयोगट- ४ ते ६) इयत्ता पहिलीसाठी अंक उच्चार १ ते १०० असा स्पर्धेचा विषय आहे. इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरीसाठी १ ते १० पाढे, ११ ते २० पाढे, २१ ते ३० पाढे. इयत्ता चौथी, इयत्ता पाचवीसाठी पावकी, निमकी, इयत्ता सहावी, इयत्ता सातवीसाठी पाऊणकी, सवायकी, इयत्ता आठवी, इयत्ता नववी, इयत्ता दहावीसाठी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असे स्पर्धेचे विषय आहेत. खुल्या गटासाठी पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे हे स्पर्धेचे विषय आहेत.”

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content