Details
“राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..”
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”

