HomeArchiveराजीवजी, शंकररावजी आणि...

राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..

Details
“राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content