HomeArchiveमुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं...

मुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन!

Details
मुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईसह राज्यातील लोकांना संरक्षण दलाविषयी माहिती होऊन सैनिकांप्रती जिव्हाळा वाढीस लागावा म्हणून मुंबईत शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन नि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .येत्या गुरुवारी सायंकाळी वांद्रा कुर्ला संकुल, एमएमआरडीए क्षेत्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उदघाटन होईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संभाजी पाटील-निलंगेकर, खा. विनय सहस्त्रबुद्धे, ले. जन. एस. के. पराशर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, इंडियन ऑइलचे परिन्दू भगत आदी उपस्थित राहणार आहेत.

वीर सेनानी फाऊंडेशन, स्वरनिनाद फाऊंडेशन यांनी राज्याच्या गृह मंत्रालयासह हे संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केलं आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी सोबत ओळखपत्र आवश्यक असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. सुमारे चार एकर परिसरात विविध प्रकारची शस्त्रे नि दारुगोळा पाहण्याचा अनुभव व माहिती घेता येईल. सकाळी दहा ते रात्री आठ, या वेळेत प्रदर्शन तर सायंकाळी ५.३० ते ८ राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित केली आहेत. तीन फेब्रुवारीपर्यंत ते चालेल. पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षितता आणि संरक्षण दल नि केंद्रीय पोलिसांची भूमिका, दुसऱ्या दिवशी २०१४आधीपेक्षा आज आम्ही अधिक सुरक्षित आहोत का? हा विषय आहे. तिसऱ्या दिवशी अंतर्गत सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं नि धोके, बाह्य धोके यावर चर्चा होईल. लष्करी नि इतर क्षेत्रातील जाणकार मान्यवर यात सहभागी होतील. वीर सेनानीचे कर्नल विक्रम पत्की, सुनील वालावलकर, स्वर निनादचे भारत बलवल्ली, ज्ञानेश परांजपे यासह इतर सर्वजण यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने जास्तीतजास्त लोकांनीं याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जातंय.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईसह राज्यातील लोकांना संरक्षण दलाविषयी माहिती होऊन सैनिकांप्रती जिव्हाळा वाढीस लागावा म्हणून मुंबईत शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन नि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .येत्या गुरुवारी सायंकाळी वांद्रा कुर्ला संकुल, एमएमआरडीए क्षेत्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उदघाटन होईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संभाजी पाटील-निलंगेकर, खा. विनय सहस्त्रबुद्धे, ले. जन. एस. के. पराशर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, इंडियन ऑइलचे परिन्दू भगत आदी उपस्थित राहणार आहेत.

वीर सेनानी फाऊंडेशन, स्वरनिनाद फाऊंडेशन यांनी राज्याच्या गृह मंत्रालयासह हे संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केलं आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी सोबत ओळखपत्र आवश्यक असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. सुमारे चार एकर परिसरात विविध प्रकारची शस्त्रे नि दारुगोळा पाहण्याचा अनुभव व माहिती घेता येईल. सकाळी दहा ते रात्री आठ, या वेळेत प्रदर्शन तर सायंकाळी ५.३० ते ८ राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित केली आहेत. तीन फेब्रुवारीपर्यंत ते चालेल. पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षितता आणि संरक्षण दल नि केंद्रीय पोलिसांची भूमिका, दुसऱ्या दिवशी २०१४आधीपेक्षा आज आम्ही अधिक सुरक्षित आहोत का? हा विषय आहे. तिसऱ्या दिवशी अंतर्गत सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं नि धोके, बाह्य धोके यावर चर्चा होईल. लष्करी नि इतर क्षेत्रातील जाणकार मान्यवर यात सहभागी होतील. वीर सेनानीचे कर्नल विक्रम पत्की, सुनील वालावलकर, स्वर निनादचे भारत बलवल्ली, ज्ञानेश परांजपे यासह इतर सर्वजण यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने जास्तीतजास्त लोकांनीं याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जातंय.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content