HomeArchiveपोलखोल लातूर मतदारसंघाचा!

पोलखोल लातूर मतदारसंघाचा!

Details
पोलखोल लातूर मतदारसंघाचा!

    13-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने
atulm2001@gmail.com
लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे तिकीट कापून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे तर, काँग्रेसने मच्छिंद्र कामत याना तिकीट देत शृंगारे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. येथे बहुजन वंचित आघाडीने राम गरकार तर बहुजन समाजवादी पक्षाने सिध्दार्थ सुर्यवंशी यांना रिंगणात उतरवल्याने ही लढत रंगतदार झाली आहे. भाजपच्या वतीने विद्यमान खासदारांच्या विरोधात पक्षांतर्गत जोरदार विरोध असल्यामुळे विमान कर्मचारी मारहाण प्रकरणातील वादग्रस्त सुनील गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सर्वत्र सांगितले जात होते. परंतु हा बालेकिल्ला सहजपणे उद्ध्वस्त केला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजपने नियोजन केले होते. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरात सर्जिकल स्टाईक करून रूपा पाटील निलंगेकर यांना खासदार म्हणून निवडून आणले व काँग्रेसचे दिग्गज शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीच्या आणि शहकाटशहाच्या राजकारणातून भाजपाच्या सुनील गायकवाड यांचा निसटता पराभव झाला होता. मागील लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत लातूरचा काँग्रेसचा गड जमिनदोस्त झाला.

यावेळी काँग्रेसला पुन्हा उभारी मिळणे अशक्यप्राय दिसत आहे. यामुळेच भाजपतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे तर मागील दोन तीन वर्षांपासून उमेदवारीच्या आशेने वेगवेगळया प्रकारची पक्षसेवा करीत होते आणि अखेर त्यांनी तिकीट मिळवल्याने भाजपतील अनेक जण नाराज झाले आहेत. तसेच विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा नाराज गट कोणती भूमिका घेतो यावर शृंगारे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या वंचित विकास आघाडीने उमेदवारी दिलेले राम गरकार मतदारसंघात फिरत असून त्यांनी आपला प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

भाजप आणि काँग्रेस यांनी आपले उमेदवार अगदी उशिरा जाहीर केल्याने आता प्रचाराची धार खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान असल्याने उमेदवारांना प्रचारासाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळणार नाही. सध्या लातूर परिसरात कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यातच प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस आपला गेलेला बालेकिल्ला पुन्हा खेचून आणणार की भाजप आपले वर्चस्व कायम ठेवणार हे अनेक समीकरणांवर अवलंबून आहे. त्यात गटबाजी, नाराजी यांचा प्रभाव किती पडतो ते लवकरच समजेल.”
 

Continue reading

उद्या सम्राट सरकारचा विस्तार तर ममता पायऊतार!

बिहारमधील सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या गुरुवारी, ७ मे रोजी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष उपस्थिती लावणार असून, पाटणा विमानतळ ते गांधी मैदान असा त्यांचा भव्य 'मेगा रोड शो'देखील...

पाकिस्तानी खेळाडूंना भारताचे दरवाजे खुले!

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बहुपक्षीय क्रीडा स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय क्रीडा संबंधांवरील बंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे....

बेंगळुरूचा पत्ता कट! आयपीएल फायनल आता अहमदाबादमध्ये!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाबाबत मोठी उलथापालथ झाली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे होमग्राऊंड असलेल्या बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद हिसकावून घेण्यात आले आहे. आता आयपीएल २०२६चा अंतिम सोहळा ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र...
Skip to content