HomeArchiveपोलखोल लातूर मतदारसंघाचा!

पोलखोल लातूर मतदारसंघाचा!

Details
पोलखोल लातूर मतदारसंघाचा!

    13-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने
atulm2001@gmail.com
लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे तिकीट कापून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे तर, काँग्रेसने मच्छिंद्र कामत याना तिकीट देत शृंगारे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. येथे बहुजन वंचित आघाडीने राम गरकार तर बहुजन समाजवादी पक्षाने सिध्दार्थ सुर्यवंशी यांना रिंगणात उतरवल्याने ही लढत रंगतदार झाली आहे. भाजपच्या वतीने विद्यमान खासदारांच्या विरोधात पक्षांतर्गत जोरदार विरोध असल्यामुळे विमान कर्मचारी मारहाण प्रकरणातील वादग्रस्त सुनील गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सर्वत्र सांगितले जात होते. परंतु हा बालेकिल्ला सहजपणे उद्ध्वस्त केला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजपने नियोजन केले होते. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरात सर्जिकल स्टाईक करून रूपा पाटील निलंगेकर यांना खासदार म्हणून निवडून आणले व काँग्रेसचे दिग्गज शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीच्या आणि शहकाटशहाच्या राजकारणातून भाजपाच्या सुनील गायकवाड यांचा निसटता पराभव झाला होता. मागील लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत लातूरचा काँग्रेसचा गड जमिनदोस्त झाला.

यावेळी काँग्रेसला पुन्हा उभारी मिळणे अशक्यप्राय दिसत आहे. यामुळेच भाजपतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे तर मागील दोन तीन वर्षांपासून उमेदवारीच्या आशेने वेगवेगळया प्रकारची पक्षसेवा करीत होते आणि अखेर त्यांनी तिकीट मिळवल्याने भाजपतील अनेक जण नाराज झाले आहेत. तसेच विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा नाराज गट कोणती भूमिका घेतो यावर शृंगारे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या वंचित विकास आघाडीने उमेदवारी दिलेले राम गरकार मतदारसंघात फिरत असून त्यांनी आपला प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

भाजप आणि काँग्रेस यांनी आपले उमेदवार अगदी उशिरा जाहीर केल्याने आता प्रचाराची धार खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान असल्याने उमेदवारांना प्रचारासाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळणार नाही. सध्या लातूर परिसरात कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यातच प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस आपला गेलेला बालेकिल्ला पुन्हा खेचून आणणार की भाजप आपले वर्चस्व कायम ठेवणार हे अनेक समीकरणांवर अवलंबून आहे. त्यात गटबाजी, नाराजी यांचा प्रभाव किती पडतो ते लवकरच समजेल.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content