HomeArchiveपोखरणमध्ये होतेय वायूशक्ती...

पोखरणमध्ये होतेय वायूशक्ती २०१९!

Details
पोखरणमध्ये होतेय वायूशक्ती २०१९!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगभरातून येणार दर्शक

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशाच्या वायू सेनेची ताकद गेल्या वर्षी ‘ऑपरेशन गगन भरारी’ने दाखवून दिल्यावर आता पुन्हा भारतीय वायू सेना येत्या शनिवारी आपल्या ताकदीचा परिचय करून देणार आहे. एक मोठा यद्धसराव सादर केला जाणार असून त्यात विविध प्रकारची १३० विमानं, हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत. जगभरातून अनेक पाहुणे येथे येणार असल्याने त्यांच्यासमोर हे कौशल्य दिसेल.

वायूशक्ती सरावात दिवसा, संध्याकाळी, रात्री युद्ध करण्याची वायू सेनेची ‘शक्ती’ सर्वांना समजेल. उपलब्ध माहितीनुसार सायंकाळी पाचनंतर सुरू होणाऱ्या या चित्तथरारक कवायती दोन तास चालू राहतील. यात वायुसेनेची सुखोई-३०, मिग-२९, मिराज-२०००, जग्वार, मिग-२७, अशी आघाडीची लढाऊ विमानं सहभाग घेतील. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची तेजस-ऍडव्हान्स लाईट, हेलिकॉप्टर रुद्र आपला दमखम दाखवतील.

 

स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आकाश आणि हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ‘अस्त्र’ हे या अभ्यासाचं आणखी एक आकर्षण आहे. सरावात सामील होणारी विमानं ही लगतच्या जैसलमेर, फलौदी, नाल, अंबाला, उत्तरलाई, आग्रा, जोधपूर या एअरबेसवरुन सामील होणार आहेत. दर तीन वर्षांनी भारतीय वायू सेना आपल्या युद्धहल्ल्याची क्षमता तपासत असते. यापूर्वी १९५४ पर्यंत दिल्ली जवळच्या तीलपत रेंजमध्ये ही प्रात्यक्षिके व्हायची. पण आता ती पोखरण येथे होतात.

दरम्यान, गेल्या बारा दिवसात दुसरे लढाऊ विमान अपघाती शिकार होऊन भंगारात गेल्याने वायू दलावर चिंतेचं सावट पसरले आहे. कारण, पुढील आठवड्यात बेंगळुरूजवळच्या येळहांका या एचएएलच्या विस्तीर्ण मैदानावर एरो स्पेस हा दर दोन वर्षांनी होणारा जागतिक शो सुरू होतोय. ऐन चार दिवस आधी मंगळवारी संध्याकाळी पोखरण रेंजवर, जैसलमेरच्या खेतोतोलाई फिल्डमध्ये मिग-२७ च्या कोसळण्याने डोकेदुखी वाढलीय. सोवियत संघ काळातील हे विमान १९८० साली खरेदी झाले होते. कारगिल युद्धात डोंगरावर लपून बसलेल्या शत्रू सैन्यावर हल्ला चढवून पाकड्या घुसखोर सैन्याचा बंदोबस्त करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. पायलट सुरक्षित असून चौकशीचे आदेश वायुदलाने दिले आहेत. फ्लॅईंग कॉफीन म्हणून कुख्यात झालेल्या या विमानाची उड्डाणे २०१०पासून थांबवण्यात आली होती. या विमान अपघातांची मालिका २००१पासून सुरू होऊन १२ अपघातग्रस्त झाली. यानंतर या तुकडीला उड्डाण थांबवण्याचे आदेश दिले गेले.

गेल्या बारा दिवसात दुसरे विमान जे अपघातग्रस्त झाले जे प्रशिक्षणासाठी गेले होते. एक फेब्रुवारी रोजी एचएएलच्या येळहांका तळावर झालेल्या अपघातात दोन पायलट ठार झाले होते. एक तर विमानाच्या ढिगाऱ्यातच पॅराशूट असूनही पडला नि स्वर्गवासी झाला. मात्र, नेमक्या कारणांचा शोध लागला नसला तरी काहींच्या मते देखभाल तर काहींच्या मते पुरेशा तंत्रकौशल्याचा अभाव सांगितले जाते. घटनेची चौकशी चालू आहे.

शनिवारी होणाऱ्या वायूशक्तीच्या अभ्यासात एकूण १३७ नाना प्रकारची विमानं भाग घेतील. मिग२९-७, जग्वार-१७, सु-३०-२४, मिग-२७ सुधारित-११, मिग-२१ बिसेन-४, मिराज २०००-४, हॉक-८, तेजस-६, AN-३२-४, C 130-५, AEW&C-१, mi 17 v5 -१५, ALH MK IV-७, Mi35-३, RPA 4 अशांचा समावेश आहे.”
 
“जगभरातून येणार दर्शक

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
देशाच्या वायू सेनेची ताकद गेल्या वर्षी ‘ऑपरेशन गगन भरारी’ने दाखवून दिल्यावर आता पुन्हा भारतीय वायू सेना येत्या शनिवारी आपल्या ताकदीचा परिचय करून देणार आहे. एक मोठा यद्धसराव सादर केला जाणार असून त्यात विविध प्रकारची १३० विमानं, हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत. जगभरातून अनेक पाहुणे येथे येणार असल्याने त्यांच्यासमोर हे कौशल्य दिसेल.

वायूशक्ती सरावात दिवसा, संध्याकाळी, रात्री युद्ध करण्याची वायू सेनेची ‘शक्ती’ सर्वांना समजेल. उपलब्ध माहितीनुसार सायंकाळी पाचनंतर सुरू होणाऱ्या या चित्तथरारक कवायती दोन तास चालू राहतील. यात वायुसेनेची सुखोई-३०, मिग-२९, मिराज-२०००, जग्वार, मिग-२७, अशी आघाडीची लढाऊ विमानं सहभाग घेतील. त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची तेजस-ऍडव्हान्स लाईट, हेलिकॉप्टर रुद्र आपला दमखम दाखवतील.

 

स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आकाश आणि हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ‘अस्त्र’ हे या अभ्यासाचं आणखी एक आकर्षण आहे. सरावात सामील होणारी विमानं ही लगतच्या जैसलमेर, फलौदी, नाल, अंबाला, उत्तरलाई, आग्रा, जोधपूर या एअरबेसवरुन सामील होणार आहेत. दर तीन वर्षांनी भारतीय वायू सेना आपल्या युद्धहल्ल्याची क्षमता तपासत असते. यापूर्वी १९५४ पर्यंत दिल्ली जवळच्या तीलपत रेंजमध्ये ही प्रात्यक्षिके व्हायची. पण आता ती पोखरण येथे होतात.

दरम्यान, गेल्या बारा दिवसात दुसरे लढाऊ विमान अपघाती शिकार होऊन भंगारात गेल्याने वायू दलावर चिंतेचं सावट पसरले आहे. कारण, पुढील आठवड्यात बेंगळुरूजवळच्या येळहांका या एचएएलच्या विस्तीर्ण मैदानावर एरो स्पेस हा दर दोन वर्षांनी होणारा जागतिक शो सुरू होतोय. ऐन चार दिवस आधी मंगळवारी संध्याकाळी पोखरण रेंजवर, जैसलमेरच्या खेतोतोलाई फिल्डमध्ये मिग-२७ च्या कोसळण्याने डोकेदुखी वाढलीय. सोवियत संघ काळातील हे विमान १९८० साली खरेदी झाले होते. कारगिल युद्धात डोंगरावर लपून बसलेल्या शत्रू सैन्यावर हल्ला चढवून पाकड्या घुसखोर सैन्याचा बंदोबस्त करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. पायलट सुरक्षित असून चौकशीचे आदेश वायुदलाने दिले आहेत. फ्लॅईंग कॉफीन म्हणून कुख्यात झालेल्या या विमानाची उड्डाणे २०१०पासून थांबवण्यात आली होती. या विमान अपघातांची मालिका २००१पासून सुरू होऊन १२ अपघातग्रस्त झाली. यानंतर या तुकडीला उड्डाण थांबवण्याचे आदेश दिले गेले.

गेल्या बारा दिवसात दुसरे विमान जे अपघातग्रस्त झाले जे प्रशिक्षणासाठी गेले होते. एक फेब्रुवारी रोजी एचएएलच्या येळहांका तळावर झालेल्या अपघातात दोन पायलट ठार झाले होते. एक तर विमानाच्या ढिगाऱ्यातच पॅराशूट असूनही पडला नि स्वर्गवासी झाला. मात्र, नेमक्या कारणांचा शोध लागला नसला तरी काहींच्या मते देखभाल तर काहींच्या मते पुरेशा तंत्रकौशल्याचा अभाव सांगितले जाते. घटनेची चौकशी चालू आहे.

शनिवारी होणाऱ्या वायूशक्तीच्या अभ्यासात एकूण १३७ नाना प्रकारची विमानं भाग घेतील. मिग२९-७, जग्वार-१७, सु-३०-२४, मिग-२७ सुधारित-११, मिग-२१ बिसेन-४, मिराज २०००-४, हॉक-८, तेजस-६, AN-३२-४, C 130-५, AEW&C-१, mi 17 v5 -१५, ALH MK IV-७, Mi35-३, RPA 4 अशांचा समावेश आहे.”
 

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content