HomeArchiveनानांच्या नावाचे रेल्वेला...

नानांच्या नावाचे रेल्वेला वावडे का?

Details
नानांच्या नावाचे रेल्वेला वावडे का?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आज 31 जुलै, 2019. नामदार नाना शंकरशेट यांची आज 154 वी पुण्यतिथी. भारतीय रेल्वेचे जनक म्हणून नाना ओळखले जातात. मुंबईचे आद्य शिल्पकार, शिक्षण तपस्वी, थोर समाजसुधारक अशा विविध रूपात नानांची ओळख करून देता येईल. आशिया खंडातील पहिली रेल्वे 16 एप्रिल, 1953 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. या रेल्वेसाठी नाना शंकरशेट यांनीच पुढाकार घेतला होता. म्हणूनच भारतीय रेल्वेचे जनक असे त्यांना मानाने संबोधिले जाते. इंग्रजांनी भारतीयांवर वर्षानुवर्षे अन्याय केला. त्यांना गुलामीत ठेवले. पण अशा या इंग्रजांनी नानांच्या कार्याचा सदैव गौरव केला. नानांचा सदैव आदर केला.

1908 साली इंग्रज सरकारने मुंबईसाठी प्रथमच एकूण आठ जस्टीस ऑफ दी पीस (जेपी) यांची नियुक्ती केली. त्यात सात इंग्रज तर एकमेव नाना शंकरशेट हे भारतीय होते. इंग्रजांनी नानांचा केलेला तो सर्वोच्च सन्मान होता. रेल्वे उभारणीत नानांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून इंग्रज सरकारने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीवर नाना शंकरशेट यांचा पुतळा कोरला आहे. केवळ नानांचाच नव्हे तर सर्व भारतीयांचा हा मोठा सन्मान आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नानांचे महत्त्व इंग्रज राज्यकर्त्यांना कळले पण ते भारतीय राज्यकर्त्यांना अद्याप समजलेले नाही. नानांचे मोठेपण त्यांच्या लक्षातच आलेले नाही. पूर्वीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, अशी नानाप्रेमींची अनेक वर्षांची मागणी होती. ती मान्य होण्यात काहीच अडचण नव्हती. नानांच्या उत्तुंग कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना एक आदेश दिला. व्हिक्टोरिया टर्मिनसचे नामांतर नाना शंकरशेट टर्मिनस करावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे बाळासाहेबांनी मनोहरपंतांना सांगितले. त्याप्रमाणे युती शासनाने तसा प्रस्ताव पाठविला. परंतु राजकीय मतभेद निर्माण झाले. त्यातूनच नानांचे नाव मागे पडले.

 
नानांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव व्ही.टी.ला देण्यात आले. त्यानंतर मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव द्यावे, असा आग्रह 1996 सालापासून तमाम नानाप्रेमींनी धरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात आली आहेत. याकामी नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र वि. शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष अॅड. सच्चिदानंद हाटकर, उपाध्यक्ष हरीष पितळे, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व किशोर कल्याणकर आणि सहकोषाध्यक्ष विजय चौलकर या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. दरवर्षी 16 एप्रिल हा दिवस `भारतीय रेल्वे दिन’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी नानांच्या नावाचा पाठपुरावा करण्यासाठी तमाम नानाप्रेमी मुंबई सेंट्रल टर्मिनस बाहेर मूक निदर्शने करतात. तसेच लाखभर सह्यादेखील गोळा करतात. पण सरकारला काही जाग येत नाही. आतापर्यंत पथनाट्ये, पत्रकार परिषदा घेऊन मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण ही मागणी म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी ठरली आहे. वास्तविक नाना हे महापुरूष होते. आचार्य अत्रे म्हणत की, महापुरूष हा शतकातून एकदाच जन्माला येतो. अशा या महापुरूषाची भारत सरकारकडून उपेक्षा व्हावी, हे आपले दुर्दैव होय. केंद्र सरकारने आता अधिक उशीर न करता मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव द्यावे. एका थोर भारतीयाचा सन्मान करून त्याचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहावे. तसे न झाल्यास इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आज 31 जुलै, 2019. नामदार नाना शंकरशेट यांची आज 154 वी पुण्यतिथी. भारतीय रेल्वेचे जनक म्हणून नाना ओळखले जातात. मुंबईचे आद्य शिल्पकार, शिक्षण तपस्वी, थोर समाजसुधारक अशा विविध रूपात नानांची ओळख करून देता येईल. आशिया खंडातील पहिली रेल्वे 16 एप्रिल, 1953 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. या रेल्वेसाठी नाना शंकरशेट यांनीच पुढाकार घेतला होता. म्हणूनच भारतीय रेल्वेचे जनक असे त्यांना मानाने संबोधिले जाते. इंग्रजांनी भारतीयांवर वर्षानुवर्षे अन्याय केला. त्यांना गुलामीत ठेवले. पण अशा या इंग्रजांनी नानांच्या कार्याचा सदैव गौरव केला. नानांचा सदैव आदर केला.

1908 साली इंग्रज सरकारने मुंबईसाठी प्रथमच एकूण आठ जस्टीस ऑफ दी पीस (जेपी) यांची नियुक्ती केली. त्यात सात इंग्रज तर एकमेव नाना शंकरशेट हे भारतीय होते. इंग्रजांनी नानांचा केलेला तो सर्वोच्च सन्मान होता. रेल्वे उभारणीत नानांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून इंग्रज सरकारने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीवर नाना शंकरशेट यांचा पुतळा कोरला आहे. केवळ नानांचाच नव्हे तर सर्व भारतीयांचा हा मोठा सन्मान आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नानांचे महत्त्व इंग्रज राज्यकर्त्यांना कळले पण ते भारतीय राज्यकर्त्यांना अद्याप समजलेले नाही. नानांचे मोठेपण त्यांच्या लक्षातच आलेले नाही. पूर्वीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, अशी नानाप्रेमींची अनेक वर्षांची मागणी होती. ती मान्य होण्यात काहीच अडचण नव्हती. नानांच्या उत्तुंग कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना एक आदेश दिला. व्हिक्टोरिया टर्मिनसचे नामांतर नाना शंकरशेट टर्मिनस करावे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे बाळासाहेबांनी मनोहरपंतांना सांगितले. त्याप्रमाणे युती शासनाने तसा प्रस्ताव पाठविला. परंतु राजकीय मतभेद निर्माण झाले. त्यातूनच नानांचे नाव मागे पडले.

 
नानांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव व्ही.टी.ला देण्यात आले. त्यानंतर मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव द्यावे, असा आग्रह 1996 सालापासून तमाम नानाप्रेमींनी धरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदने देण्यात आली आहेत. याकामी नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र वि. शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष अॅड. सच्चिदानंद हाटकर, उपाध्यक्ष हरीष पितळे, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व किशोर कल्याणकर आणि सहकोषाध्यक्ष विजय चौलकर या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. दरवर्षी 16 एप्रिल हा दिवस `भारतीय रेल्वे दिन’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी नानांच्या नावाचा पाठपुरावा करण्यासाठी तमाम नानाप्रेमी मुंबई सेंट्रल टर्मिनस बाहेर मूक निदर्शने करतात. तसेच लाखभर सह्यादेखील गोळा करतात. पण सरकारला काही जाग येत नाही. आतापर्यंत पथनाट्ये, पत्रकार परिषदा घेऊन मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण ही मागणी म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी ठरली आहे. वास्तविक नाना हे महापुरूष होते. आचार्य अत्रे म्हणत की, महापुरूष हा शतकातून एकदाच जन्माला येतो. अशा या महापुरूषाची भारत सरकारकडून उपेक्षा व्हावी, हे आपले दुर्दैव होय. केंद्र सरकारने आता अधिक उशीर न करता मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव द्यावे. एका थोर भारतीयाचा सन्मान करून त्याचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहावे. तसे न झाल्यास इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही.”
 

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content