HomeArchiveनरेंद्र मोदी सरकारचे...

नरेंद्र मोदी सरकारचे आदेश देवेंद्र सरकार मानत नाही! आमदार हरीभाऊ राठोड यांचा दावा

Details
नरेंद्र मोदी सरकारचे आदेश देवेंद्र सरकार मानत नाही! आमदार हरीभाऊ राठोड यांचा दावा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

बढतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षणाला, अनेक राज्यात त्या-त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थगिती दिल्यानंतर, गेल्यावर्षी अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली. या सर्व प्रकरणांमध्ये एम. नागराज या याचिकाकर्त्याच्या २००६ च्या याचिकेचा उल्लेख करण्यात येत होता. त्यामुळे बढतीमधील आरक्षण हे चार-पाच भारतीय जनता पार्टीशासित राज्यांमध्ये बंद करण्यात आले होते. तर २५ पेक्षा जास्त राज्यांमध्ये आजही बढतीमधील आरक्षण चालू आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये लाखो मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी बढतीसाठी चातकासारखी वाट पाहत असून अनेक कर्मचारी बढतीविना निवृत्त झाले आहेत. अनेक अधिकारी-कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर आहेत. लाखो कर्मचाऱ्यांना बढतीमधील आरक्षण न मिळाल्यामुळे, त्यांचे कायमचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा दावा बहुजन समाजाचे नेते आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

१ जानेवारी २०१९ पासून त्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्यामुळे त्यांचे अधिकच, कायमचे आर्थिक नुकसान होणार आहे. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने, बढतीमधील आरक्षण चालू करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला आणि डी.ओ.पी.टी विभागाने तसे आदेश काढून सर्व राज्यांच्या, मुख्य सचिवांना कळविले की, बढतीमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून चालू करण्यात यावे. असे असताना महाराष्ट्राच्या विधि व न्याय विभागाने हे आदेश न मानण्याचे ठरविले व हे आदेश राज्याला लागू होत नाही, असे अभिप्राय दिले व त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. विधि व न्याय या विभागाच्या नावांमधील “न्याय” हे शब्द काढून टाकावे कारण, हा विभाग न्याय करीत नसून, अन्याय करणारा विभाग आहे. हेच सिद्ध होत आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारचे आदेश देवेंद्र सरकार मानीत नाही, हेही सिद्ध होत आहे, असे राठोड यांनी म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

बढतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षणाला, अनेक राज्यात त्या-त्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थगिती दिल्यानंतर, गेल्यावर्षी अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली. या सर्व प्रकरणांमध्ये एम. नागराज या याचिकाकर्त्याच्या २००६ च्या याचिकेचा उल्लेख करण्यात येत होता. त्यामुळे बढतीमधील आरक्षण हे चार-पाच भारतीय जनता पार्टीशासित राज्यांमध्ये बंद करण्यात आले होते. तर २५ पेक्षा जास्त राज्यांमध्ये आजही बढतीमधील आरक्षण चालू आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये लाखो मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी बढतीसाठी चातकासारखी वाट पाहत असून अनेक कर्मचारी बढतीविना निवृत्त झाले आहेत. अनेक अधिकारी-कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर आहेत. लाखो कर्मचाऱ्यांना बढतीमधील आरक्षण न मिळाल्यामुळे, त्यांचे कायमचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा दावा बहुजन समाजाचे नेते आमदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

१ जानेवारी २०१९ पासून त्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्यामुळे त्यांचे अधिकच, कायमचे आर्थिक नुकसान होणार आहे. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने, बढतीमधील आरक्षण चालू करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला आणि डी.ओ.पी.टी विभागाने तसे आदेश काढून सर्व राज्यांच्या, मुख्य सचिवांना कळविले की, बढतीमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून चालू करण्यात यावे. असे असताना महाराष्ट्राच्या विधि व न्याय विभागाने हे आदेश न मानण्याचे ठरविले व हे आदेश राज्याला लागू होत नाही, असे अभिप्राय दिले व त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. विधि व न्याय या विभागाच्या नावांमधील “न्याय” हे शब्द काढून टाकावे कारण, हा विभाग न्याय करीत नसून, अन्याय करणारा विभाग आहे. हेच सिद्ध होत आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारचे आदेश देवेंद्र सरकार मानीत नाही, हेही सिद्ध होत आहे, असे राठोड यांनी म्हटले आहे.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content