HomeArchiveदोन निवडणुका!

दोन निवडणुका!

Details
दोन निवडणुका!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाआधी दोन राज्यांतील विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या. हरियाणा आणि राजस्थान येथील पोटनिवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसने 99 जागा जिंकून विजय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत रामगढ मतदारसंघातून काँग्रेसच्या साफीया झुबेर या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे राजस्थानात काँग्रेसने जागांचे शतक पूर्ण केले आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला लाभलेला हा शुभशकून आहे. हरियाणाच्या जिन्द मतदारसंघात काँग्रेसचे विशेष अस्तित्व नव्हते. तरीही काँग्रेसने आपले प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना उमेदवारी दिली. सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातून विधानसभेवर यापूर्वीच निवडून गेले आहेत. तरीही त्यांना पोटनिवडणुकीत उभे करून काँग्रेसने काय साधले, हे एकट्या राहुल गांधी यांनाच ठाऊक! सुरजेवाला तरुण आहेत. ते उत्तम बोलतात. प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात ते चांगले चमकतात. सारांश, त्यांचे विमान नेहमी प्रसिद्धीच्या उंच आकाशात झेप घेत असते. कदाचित, हे `विमान’ खाली उतरविण्यासाठीच सुरजेवाला यांना जिन्द मतदारसंघातून उभे केले गेले असावे. कारण सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर जाऊन दारूणरित्या पराभूत झाले. भारतीय जनता पार्टीचे किशन मिध्धा यांनी 12 हजार मतांनी विजय मिळविला.

 

दोन पोटनिवडणुकांत काँग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा जिंकून लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा `सामना’ अनिर्णीत ठेवला, असे दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. जिन्द हा भाजपाचा बालेकिल्लाच होता. काँग्रेसने तो गमावला यात विशेष काही नाही. पण राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाची आणखी एक जागा हिसकावून घेऊन आपले विधानसभेतील जागांचे शतक पूर्ण केले. भाजपाला अशाप्रकारे सणसणीत चपराक लगावली. भाजपा नेतृत्त्वाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा दिसून आले. आता घोडामैदान दूर नाही. एकीकडे विरोधक सत्ताधारी भाजपाविरुद्ध एकवटले आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

 

एकेकाळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे दिग्गज पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर निवडून गेले होते. पण गेल्या दोन दशकात या राज्यांत काँग्रेसचे अस्तित्त्व पणाला लागले आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे चित्र बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. पोटनिवडणुकांवरून सदैव लोकांचा ट्रेंड कळत असतो. या निवडणुकीतदेखील तो उघड झाला आहे. राजस्थानने काँग्रेसच्या झोळीत जनतेने आणखी एक जागा टाकून काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. भाजपाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाआधी दोन राज्यांतील विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या. हरियाणा आणि राजस्थान येथील पोटनिवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसने 99 जागा जिंकून विजय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत रामगढ मतदारसंघातून काँग्रेसच्या साफीया झुबेर या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे राजस्थानात काँग्रेसने जागांचे शतक पूर्ण केले आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला लाभलेला हा शुभशकून आहे. हरियाणाच्या जिन्द मतदारसंघात काँग्रेसचे विशेष अस्तित्व नव्हते. तरीही काँग्रेसने आपले प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना उमेदवारी दिली. सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातून विधानसभेवर यापूर्वीच निवडून गेले आहेत. तरीही त्यांना पोटनिवडणुकीत उभे करून काँग्रेसने काय साधले, हे एकट्या राहुल गांधी यांनाच ठाऊक! सुरजेवाला तरुण आहेत. ते उत्तम बोलतात. प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात ते चांगले चमकतात. सारांश, त्यांचे विमान नेहमी प्रसिद्धीच्या उंच आकाशात झेप घेत असते. कदाचित, हे `विमान’ खाली उतरविण्यासाठीच सुरजेवाला यांना जिन्द मतदारसंघातून उभे केले गेले असावे. कारण सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर जाऊन दारूणरित्या पराभूत झाले. भारतीय जनता पार्टीचे किशन मिध्धा यांनी 12 हजार मतांनी विजय मिळविला.

 

दोन पोटनिवडणुकांत काँग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा जिंकून लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा `सामना’ अनिर्णीत ठेवला, असे दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. जिन्द हा भाजपाचा बालेकिल्लाच होता. काँग्रेसने तो गमावला यात विशेष काही नाही. पण राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाची आणखी एक जागा हिसकावून घेऊन आपले विधानसभेतील जागांचे शतक पूर्ण केले. भाजपाला अशाप्रकारे सणसणीत चपराक लगावली. भाजपा नेतृत्त्वाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा दिसून आले. आता घोडामैदान दूर नाही. एकीकडे विरोधक सत्ताधारी भाजपाविरुद्ध एकवटले आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

 

एकेकाळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे दिग्गज पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर निवडून गेले होते. पण गेल्या दोन दशकात या राज्यांत काँग्रेसचे अस्तित्त्व पणाला लागले आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे चित्र बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. पोटनिवडणुकांवरून सदैव लोकांचा ट्रेंड कळत असतो. या निवडणुकीतदेखील तो उघड झाला आहे. राजस्थानने काँग्रेसच्या झोळीत जनतेने आणखी एक जागा टाकून काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. भाजपाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.”
 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content